HomeArchive२०२२च्या आधी तयार...

२०२२च्या आधी तयार होणार समृद्धी महामार्ग – एकनाथ शिंदे

Details
२०२२च्या आधी तयार होणार समृद्धी महामार्ग – एकनाथ शिंदे

    21-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
 
मुंबई-नागपूर शहरांना जोडणाऱ्या राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे २० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
 
 
ठाणे येथील एमएसआरडीसी कार्यालयात समृद्धी महामार्ग प्रकल्पाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. समृद्धी महामार्गाचे काम २० टक्के पूर्ण झाले असून २०२२ पर्यंत हा संपूर्ण रस्ता बनून तयार होणार आहे. या महामार्गाच्या कामासाठी अनेक लोकांनी सहकार्य केले असून कमी वेळात जमीनीचे अधिग्रहण झाले आहे. या संबंधित जमीनीच्या मालकांना योग्य तो मोबदलादेखील देण्यात आला आहे. या महामार्गासाठी स्वतः पुढे होऊन लोकांनी पुढाकार घेतला. या महामार्गात कृषी समृद्धी केंद्र, लॉजिस्टिक, फूड प्रोसेसिंगची केंद्रे उभारले जाणार असून कृषी संबंधित उद्योगांना यामुळे चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार आहे. यासाठी ८,३११ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या महामार्गाच्या कामासाठी सर्व विभागाच्या आवश्यक असलेल्या परवानग्या घेण्यात आल्या असून याचे काम सुरू झाले आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी आता लागत असलेल्या १६ तासाच्या निम्म्या वेळेत म्हणजे ७ तासत मुंबई गाठता येणार आहे, असे ते म्हणाले.
 
काय आहे सम्रुद्धी महामार्ग प्रकल्प?
 
 
समृद्धी महामार्ग हा नागपूर ते ठाणे असा ७०० किलोमीटरचा हा संपूर्ण नवा महामार्ग असणार आहे. १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५६ गावातून हा महामार्ग जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. आता मुंबईहून नागपूरला पोहोचायला सरासरी १६ तास लागतात. या महामार्गामुळे तो कालावधी निम्म्यावर येणार आहे.”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
 
मुंबई-नागपूर शहरांना जोडणाऱ्या राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे २० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
 
 
“ठाणे येथील एमएसआरडीसी कार्यालयात समृद्धी महामार्ग प्रकल्पाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. समृद्धी महामार्गाचे काम २० टक्के पूर्ण झाले असून २०२२ पर्यंत हा संपूर्ण रस्ता बनून तयार होणार आहे. या महामार्गाच्या कामासाठी अनेक लोकांनी सहकार्य केले असून कमी वेळात जमीनीचे अधिग्रहण झाले आहे. या संबंधित जमीनीच्या मालकांना योग्य तो मोबदलादेखील देण्यात आला आहे. या महामार्गासाठी स्वतः पुढे होऊन लोकांनी पुढाकार घेतला. या महामार्गात कृषी समृद्धी केंद्र, लॉजिस्टिक, फूड प्रोसेसिंगची केंद्रे उभारले जाणार असून कृषी संबंधित उद्योगांना यामुळे चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार आहे. यासाठी ८,३११ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या महामार्गाच्या कामासाठी सर्व विभागाच्या आवश्यक असलेल्या परवानग्या घेण्यात आल्या असून याचे काम सुरू झाले आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी आता लागत असलेल्या १६ तासाच्या निम्म्या वेळेत म्हणजे ७ तासत मुंबई गाठता येणार आहे, असे ते म्हणाले.”

 
काय आहे सम्रुद्धी महामार्ग प्रकल्प?
 
 
“समृद्धी महामार्ग हा नागपूर ते ठाणे असा ७०० किलोमीटरचा हा संपूर्ण नवा महामार्ग असणार आहे. १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५६ गावातून हा महामार्ग जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. आता मुंबईहून नागपूरला पोहोचायला सरासरी १६ तास लागतात. या महामार्गामुळे तो कालावधी निम्म्यावर येणार आहे.”

Continue reading

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...

भोंदूबाबा खरात प्रकरणात आता ‘लीगल टायगर’ची एन्ट्री!

विकृत, बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता न्यायालयीन अवस्थेत पोहोचत असताना, राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या संवेदनशील खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य गृह...

फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मातल्या व्यक्तीलाच एससीचे आरक्षण!

एखाद्या व्यक्तीने जन्माने अनुसूचित जातीत (शेड्युल कास्ट) जन्म घेतला, आयुष्यभर जातीय भेदभाव सोसला, पण नंतर धर्म बदलला, तर त्याला एससीचे (अनुसूचित जातीचे) संरक्षण मिळणार का? हा प्रश्न दशकांपासून भारतीय न्यायालयांत घोळत होता. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी यावर ठोस निकाल देताना...
Skip to content