HomeArchive२०२२च्या आधी तयार...

२०२२च्या आधी तयार होणार समृद्धी महामार्ग – एकनाथ शिंदे

Details
२०२२च्या आधी तयार होणार समृद्धी महामार्ग – एकनाथ शिंदे

    21-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
 
मुंबई-नागपूर शहरांना जोडणाऱ्या राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे २० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
 
 
ठाणे येथील एमएसआरडीसी कार्यालयात समृद्धी महामार्ग प्रकल्पाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. समृद्धी महामार्गाचे काम २० टक्के पूर्ण झाले असून २०२२ पर्यंत हा संपूर्ण रस्ता बनून तयार होणार आहे. या महामार्गाच्या कामासाठी अनेक लोकांनी सहकार्य केले असून कमी वेळात जमीनीचे अधिग्रहण झाले आहे. या संबंधित जमीनीच्या मालकांना योग्य तो मोबदलादेखील देण्यात आला आहे. या महामार्गासाठी स्वतः पुढे होऊन लोकांनी पुढाकार घेतला. या महामार्गात कृषी समृद्धी केंद्र, लॉजिस्टिक, फूड प्रोसेसिंगची केंद्रे उभारले जाणार असून कृषी संबंधित उद्योगांना यामुळे चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार आहे. यासाठी ८,३११ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या महामार्गाच्या कामासाठी सर्व विभागाच्या आवश्यक असलेल्या परवानग्या घेण्यात आल्या असून याचे काम सुरू झाले आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी आता लागत असलेल्या १६ तासाच्या निम्म्या वेळेत म्हणजे ७ तासत मुंबई गाठता येणार आहे, असे ते म्हणाले.
 
काय आहे सम्रुद्धी महामार्ग प्रकल्प?
 
 
समृद्धी महामार्ग हा नागपूर ते ठाणे असा ७०० किलोमीटरचा हा संपूर्ण नवा महामार्ग असणार आहे. १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५६ गावातून हा महामार्ग जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. आता मुंबईहून नागपूरला पोहोचायला सरासरी १६ तास लागतात. या महामार्गामुळे तो कालावधी निम्म्यावर येणार आहे.”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
 
मुंबई-नागपूर शहरांना जोडणाऱ्या राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे २० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
 
 
“ठाणे येथील एमएसआरडीसी कार्यालयात समृद्धी महामार्ग प्रकल्पाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. समृद्धी महामार्गाचे काम २० टक्के पूर्ण झाले असून २०२२ पर्यंत हा संपूर्ण रस्ता बनून तयार होणार आहे. या महामार्गाच्या कामासाठी अनेक लोकांनी सहकार्य केले असून कमी वेळात जमीनीचे अधिग्रहण झाले आहे. या संबंधित जमीनीच्या मालकांना योग्य तो मोबदलादेखील देण्यात आला आहे. या महामार्गासाठी स्वतः पुढे होऊन लोकांनी पुढाकार घेतला. या महामार्गात कृषी समृद्धी केंद्र, लॉजिस्टिक, फूड प्रोसेसिंगची केंद्रे उभारले जाणार असून कृषी संबंधित उद्योगांना यामुळे चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार आहे. यासाठी ८,३११ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या महामार्गाच्या कामासाठी सर्व विभागाच्या आवश्यक असलेल्या परवानग्या घेण्यात आल्या असून याचे काम सुरू झाले आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यावर नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी आता लागत असलेल्या १६ तासाच्या निम्म्या वेळेत म्हणजे ७ तासत मुंबई गाठता येणार आहे, असे ते म्हणाले.”

 
काय आहे सम्रुद्धी महामार्ग प्रकल्प?
 
 
“समृद्धी महामार्ग हा नागपूर ते ठाणे असा ७०० किलोमीटरचा हा संपूर्ण नवा महामार्ग असणार आहे. १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५६ गावातून हा महामार्ग जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. आता मुंबईहून नागपूरला पोहोचायला सरासरी १६ तास लागतात. या महामार्गामुळे तो कालावधी निम्म्यावर येणार आहे.”

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content