HomeArchiveदसऱ्यानिमित्त भातखळकर यांनी...

दसऱ्यानिमित्त भातखळकर यांनी लुटले जनसंपर्काचे सोने

Details
दसऱ्यानिमित्त भातखळकर यांनी लुटले जनसंपर्काचे सोने

    09-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
मुंबईतल्या कांदिवली पूर्व भाजपा-शिवसेना-आरपीआय-रासप महायुतीचे उमेदवार अतुल भातखळकर यांनी विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या सुट्टीचा पुरेपूर लाभ उठवत जोरदार जनसंपर्क केला. मालाड पूर्व आणि कांदिवली पूर्व इथल्या अनेक वस्त्यांत त्यांनी मतदारांची गाठभेट घेतली. ठिकठिकाणी लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
 
दसऱ्यानिमित्त आज असलेल्या सुट्टीमुळे मतदार मोठ्या संख्येने घरी असल्याचा फायदा घेत पदयात्रा आणि रथयात्रेच्या मध्यमातून भातखळकर सकाळपासून मतदारसंघात फिरत होते. मालाड पूर्व येथे सकाळी ठीक ९ वाजता वडारी पाडा, निवेटिया रोड येथून प्रचाराला सुरूवात झाली. या वस्तीत कनिष्ठ मध्यमवर्गीय मतदारांची संख्या खूप मोठी आहे. भातखळकरांनी पदयात्रेच्या माध्यमातून गल्लीबोळात जाऊन मतदारांची भेट घेतली. गेल्या ५ वर्षांत या भागात सतत ठेवलेला संपर्क आणि त्यांनी केलेली जनसुविधांची कामे यामुळे त्यांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. विशेषतः महिलांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. अनेक ठिकाणी वृद्ध महिलांना भातखळकर वाकून नमस्कार होते. त्यांनी भातखळकरांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
 
 

 
 
 
पदयात्रा संपल्यानंतर त्यांनी स्वामी नारायण पंथीय संतांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.सायंकाळी ५ वाजल्यापासून बाणडोंगरी ते अशोकनगर असा निवडणूकरथावरून प्रवास करत जनसंपर्क केला. गेल्या ५ वर्षांत केलेली कामे, संघटनेची उत्तम बांधणी आणि शिवसेना-आरपीआय-रासप या मित्रपक्षांच्या मजबूत पाठबळामुळे त्यांच्यासोबत सदोदित कार्यकर्त्यांचा मोठा जथ्था असतो. कांदिवली पूर्व मतदारसंघात इतर कोणत्याही उमेदवाराकडे ना एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा जत्था आहे, ना जनतेचा पाठिंबा! अतुल भातखळकर यांनी सुनियोजित प्रचाराच्या माध्यमातून मतदारसंघात चांगले वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे तूर्तास तरी ही लढत पूर्णपणे एकतर्फी दिसत आहे, अशी चर्चा या मतदारसंघात आहे.
 
 

 

 
 
 
 ”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
मुंबईतल्या कांदिवली पूर्व भाजपा-शिवसेना-आरपीआय-रासप महायुतीचे उमेदवार अतुल भातखळकर यांनी विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या सुट्टीचा पुरेपूर लाभ उठवत जोरदार जनसंपर्क केला. मालाड पूर्व आणि कांदिवली पूर्व इथल्या अनेक वस्त्यांत त्यांनी मतदारांची गाठभेट घेतली. ठिकठिकाणी लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
 

“दसऱ्यानिमित्त आज असलेल्या सुट्टीमुळे मतदार मोठ्या संख्येने घरी असल्याचा फायदा घेत पदयात्रा आणि रथयात्रेच्या मध्यमातून भातखळकर सकाळपासून मतदारसंघात फिरत होते. मालाड पूर्व येथे सकाळी ठीक ९ वाजता वडारी पाडा, निवेटिया रोड येथून प्रचाराला सुरूवात झाली. या वस्तीत कनिष्ठ मध्यमवर्गीय मतदारांची संख्या खूप मोठी आहे. भातखळकरांनी पदयात्रेच्या माध्यमातून गल्लीबोळात जाऊन मतदारांची भेट घेतली. गेल्या ५ वर्षांत या भागात सतत ठेवलेला संपर्क आणि त्यांनी केलेली जनसुविधांची कामे यामुळे त्यांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. विशेषतः महिलांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. अनेक ठिकाणी वृद्ध महिलांना भातखळकर वाकून नमस्कार होते. त्यांनी भातखळकरांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.”
 
 

 
 
 
“पदयात्रा संपल्यानंतर त्यांनी स्वामी नारायण पंथीय संतांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.सायंकाळी ५ वाजल्यापासून बाणडोंगरी ते अशोकनगर असा निवडणूकरथावरून प्रवास करत जनसंपर्क केला. गेल्या ५ वर्षांत केलेली कामे, संघटनेची उत्तम बांधणी आणि शिवसेना-आरपीआय-रासप या मित्रपक्षांच्या मजबूत पाठबळामुळे त्यांच्यासोबत सदोदित कार्यकर्त्यांचा मोठा जथ्था असतो. कांदिवली पूर्व मतदारसंघात इतर कोणत्याही उमेदवाराकडे ना एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा जत्था आहे, ना जनतेचा पाठिंबा! अतुल भातखळकर यांनी सुनियोजित प्रचाराच्या माध्यमातून मतदारसंघात चांगले वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे तूर्तास तरी ही लढत पूर्णपणे एकतर्फी दिसत आहे, अशी चर्चा या मतदारसंघात आहे.”
 
 

 

 
 
 
 

कांदिवली पूर्व भाजपा-शिवसेना-आरपीआय-रासप महायुतीअतुल भातखळकर यांनी विजयादशमीमतदारसंघपदयात्रा

Continue reading

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...
Skip to content