HomeArchive26 फेब्रुवारीला सावरकर...

26 फेब्रुवारीला सावरकर कविसंमेलन!

Details
26 फेब्रुवारीला सावरकर कविसंमेलन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे प्रखर राष्ट्रप्रेम आणि अतुलनीय प्रतिभाशक्ती यांचा अद्वितीय संगम. साहित्यिक म्हणूनही सावरकरांनी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांची चरित्रे, आत्मचरित्रे, त्यांचे साहित्य, विचार, कार्य, त्यांची राष्ट्रनिष्ठा यातून सिद्ध होते. त्यांनी विपुल आणि दर्जेदार साहित्य निर्मितीही केली. त्यामध्ये कवितांचाही समावेश होता. त्यामुळे त्यांच्या २६ फेब्रुवारी २०१९ या दिवशी ५४ व्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव करणार्‍या स्वरचित कविता सदर कविसंमेलनामध्ये सादर करता येईल. स्वलिखित कविता २० ते २४ ओळींमध्ये असावी तसेच कोणतीही प्रस्तावना न करता सदर कविता ३ मिनिटांत सादर करावी लागेल. स्वलिखित कविता पाठवण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०१९ रात्री १२ पर्यंत आहे. देवनागरी लिपीत टंकलेखन केलेली कविता केवळ गुरुदत्त वाकदेकर यांना ९९८७७४६७७६ ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. छायाचित्र किंवा पिडीएफ स्वरूपातील फाईल पाठवू नये. आपण पाठवलेल्या रचना निवड समितीकडे पाठवल्या जातील. त्यानंतर सहभाग यादी जाहीर केली जाईल. निवड समितीने निवडलेल्या केवळ ५० कवी/कवयित्रींना सादरीकरणाची संधी मिळेल. सादरीकरण करणार्‍या सर्व कवी/कवयित्रींना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.

संमेलन स्थळ: स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, २५२, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर (प.) मुंबई – ४०००२८ असे असून ते दिनांक २६ फेब्रुवारी २०१९ (मंगळवार) या दिवशी होईल. संमेलनाची वेळ सकाळी ९:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत असेल. कार्यक्रम दिलेल्या वेळीच सुरू होईल, त्यामुळे सर्वांनी १५ मिनिटे आधी हजर राहवे, असे आवाहन निमंत्रक व स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर परांजपे ९८१९६५८३६५ व गुरुदत्त वाकदेकर ९९८७७४६७७६ यांना संपर्क करा.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे प्रखर राष्ट्रप्रेम आणि अतुलनीय प्रतिभाशक्ती यांचा अद्वितीय संगम. साहित्यिक म्हणूनही सावरकरांनी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांची चरित्रे, आत्मचरित्रे, त्यांचे साहित्य, विचार, कार्य, त्यांची राष्ट्रनिष्ठा यातून सिद्ध होते. त्यांनी विपुल आणि दर्जेदार साहित्य निर्मितीही केली. त्यामध्ये कवितांचाही समावेश होता. त्यामुळे त्यांच्या २६ फेब्रुवारी २०१९ या दिवशी ५४ व्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव करणार्‍या स्वरचित कविता सदर कविसंमेलनामध्ये सादर करता येईल. स्वलिखित कविता २० ते २४ ओळींमध्ये असावी तसेच कोणतीही प्रस्तावना न करता सदर कविता ३ मिनिटांत सादर करावी लागेल. स्वलिखित कविता पाठवण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०१९ रात्री १२ पर्यंत आहे. देवनागरी लिपीत टंकलेखन केलेली कविता केवळ गुरुदत्त वाकदेकर यांना ९९८७७४६७७६ ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. छायाचित्र किंवा पिडीएफ स्वरूपातील फाईल पाठवू नये. आपण पाठवलेल्या रचना निवड समितीकडे पाठवल्या जातील. त्यानंतर सहभाग यादी जाहीर केली जाईल. निवड समितीने निवडलेल्या केवळ ५० कवी/कवयित्रींना सादरीकरणाची संधी मिळेल. सादरीकरण करणार्‍या सर्व कवी/कवयित्रींना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.

संमेलन स्थळ: स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, २५२, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर (प.) मुंबई – ४०००२८ असे असून ते दिनांक २६ फेब्रुवारी २०१९ (मंगळवार) या दिवशी होईल. संमेलनाची वेळ सकाळी ९:३० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत असेल. कार्यक्रम दिलेल्या वेळीच सुरू होईल, त्यामुळे सर्वांनी १५ मिनिटे आधी हजर राहवे, असे आवाहन निमंत्रक व स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर परांजपे ९८१९६५८३६५ व गुरुदत्त वाकदेकर ९९८७७४६७७६ यांना संपर्क करा.”

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content