HomeArchiveदाजी पणशीकर करणार...

दाजी पणशीकर करणार `मनस्वी’चे प्रकाशन

Details
दाजी पणशीकर करणार `मनस्वी’चे प्रकाशन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

26 फेब्रुवारीला होणार कार्यक्रम

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वारस प्रत्यक्ष विचारातूनही तितक्याच प्रभावीपणे कृतीतून साकारणारे विक्रमराव सावरकर यांच्या जीवनावर आधारित मनस्वी, हे अनुराधा वसंत खोत यांनी लिहिलेले पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशित करत असून त्याचा प्रकाशन सोहळा दाजी पणशीकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी 26 फेब्रुवारी 2019 या दिवशी सायंकाळी 7 वाजता मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे होत आहे.

 

`मनस्वी’ हे पुस्तक यापूर्वी अनुराधा खोत यांनी लिहिलेल्या मनोरमा प्रकाशन प्रकाशित `युद्ध आमुचे सुरू’ यांची दुसरी आवृत्ती असून ते पुनर्मुद्रित आहे. सावरकरभक्त तसेच वाचकांच्या मागणीमुळे त्याचे पुनर्मुद्रण स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे प्रकाशनपूर्व तसेच त्यादिवशी त्याची किंमत 50 टक्के सवलतीत असेल. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी दूरध्वनी 9821374626 वर संपर्क साधावा, असे आवाहन संबंधितांकडून करण्यात आले आहे.

देशाच्या हितासाठी विक्रमरावांनी सातत्याने समान नागरी कायद्याचा अवलंब केला. मुरबाड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र मिलिट्री स्कूलची स्थापना त्यांनी केली असून या निवासी सैनिकी शाळेतून अनेक विद्यार्थी आज शासकीय सेवेत तसेच सैन्यात आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर गुणवंत खेळाडू म्हणून लौकिक प्राप्त करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा वारसा प्रत्यक्ष कृतीत सांभाळत त्यांनी हिंदूसंघटन व हिंदूरक्षणाची मोहीम राबवली. त्यामुळेच विक्रमरावांचे विचार व त्यांच्या कृतीशीलतेचे आज फार मोठे महत्त्व आहे.”
 
“26 फेब्रुवारीला होणार कार्यक्रम

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वारस प्रत्यक्ष विचारातूनही तितक्याच प्रभावीपणे कृतीतून साकारणारे विक्रमराव सावरकर यांच्या जीवनावर आधारित मनस्वी, हे अनुराधा वसंत खोत यांनी लिहिलेले पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रकाशित करत असून त्याचा प्रकाशन सोहळा दाजी पणशीकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी 26 फेब्रुवारी 2019 या दिवशी सायंकाळी 7 वाजता मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे होत आहे.

 

`मनस्वी’ हे पुस्तक यापूर्वी अनुराधा खोत यांनी लिहिलेल्या मनोरमा प्रकाशन प्रकाशित `युद्ध आमुचे सुरू’ यांची दुसरी आवृत्ती असून ते पुनर्मुद्रित आहे. सावरकरभक्त तसेच वाचकांच्या मागणीमुळे त्याचे पुनर्मुद्रण स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे प्रकाशनपूर्व तसेच त्यादिवशी त्याची किंमत 50 टक्के सवलतीत असेल. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी दूरध्वनी 9821374626 वर संपर्क साधावा, असे आवाहन संबंधितांकडून करण्यात आले आहे.

देशाच्या हितासाठी विक्रमरावांनी सातत्याने समान नागरी कायद्याचा अवलंब केला. मुरबाड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र मिलिट्री स्कूलची स्थापना त्यांनी केली असून या निवासी सैनिकी शाळेतून अनेक विद्यार्थी आज शासकीय सेवेत तसेच सैन्यात आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर गुणवंत खेळाडू म्हणून लौकिक प्राप्त करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा वारसा प्रत्यक्ष कृतीत सांभाळत त्यांनी हिंदूसंघटन व हिंदूरक्षणाची मोहीम राबवली. त्यामुळेच विक्रमरावांचे विचार व त्यांच्या कृतीशीलतेचे आज फार मोठे महत्त्व आहे.”
 

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content