HomeArchive'क्रांती चिरायु होवो'चे...

‘क्रांती चिरायु होवो’चे 15 ऑगस्टला प्रकाशन!

Details
‘क्रांती चिरायु होवो’चे 15 ऑगस्टला प्रकाशन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भरारी प्रकाशनच्या लता गुठेनिर्मित व ज्येष्ठ लेखिका स्मिता भागवत यांनी लिहिलेलं ‘क्रांती चिरायू होवो’ या पुस्तकाचे प्रकाशन 15 ऑगस्टला होणार आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, उद्द्येश हाच आहे की आजच्या आणि उद्याच्या पिढीला देशासाठी ज्यांनी बलिदान दिले आहे त्यांचं कार्य पोहोचावं आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीरांची आठवण कायम मनात जपून ठेवावी. पुस्तक प्रकाशित करून तुमच्या हातात ते देण्याचं माझं काम मी करत आहे. पण, तुमचं काम आहे, ते शाळा-कॉलेजपर्यंत, वाचनालयपर्यंत हेही पुस्तक पोहोचावे. 15 ऑगस्टच्या निमित्ताने भेट म्हणून ही पुस्तकं देण्यात यावीत. काही प्रमाणात का होईना आपलं कर्तव्य आपण पार पाडुया.

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडावंदन करून आपण घरी येतो. या स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून वावरतो. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला आयत्या पिठावर रेघोट्या ओढायला मिळाल्या आहेत. ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्या क्रांतिकारकाचा किती त्याग त्यामागे आहे हे आठवले तरी अंगावर शहारे येतात. अशा या क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यासाठी मी घेतलेले हे व्रत. प्रत्येक 15 ऑगस्टला क्रांतिवीरावर एक पुस्तक प्रकाशित करायचे हा नियम आहे. पहिल्या वर्षी ‘सावरकरांची पत्रकारिता’ हा विषय निवडला होता. त्यानंतर गेल्यावर्षी ‘मॅडम कामा’ यांच्यावर पुस्तक काढलं आणि यावर्षी हे अप्रतिम पुस्तक, मला प्रकाशित करायला मिळत आहे याचा मनोमन आनंद होत आहे, असेही त्यांनी सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भरारी प्रकाशनच्या लता गुठेनिर्मित व ज्येष्ठ लेखिका स्मिता भागवत यांनी लिहिलेलं ‘क्रांती चिरायू होवो’ या पुस्तकाचे प्रकाशन 15 ऑगस्टला होणार आहे. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, उद्द्येश हाच आहे की आजच्या आणि उद्याच्या पिढीला देशासाठी ज्यांनी बलिदान दिले आहे त्यांचं कार्य पोहोचावं आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीरांची आठवण कायम मनात जपून ठेवावी. पुस्तक प्रकाशित करून तुमच्या हातात ते देण्याचं माझं काम मी करत आहे. पण, तुमचं काम आहे, ते शाळा-कॉलेजपर्यंत, वाचनालयपर्यंत हेही पुस्तक पोहोचावे. 15 ऑगस्टच्या निमित्ताने भेट म्हणून ही पुस्तकं देण्यात यावीत. काही प्रमाणात का होईना आपलं कर्तव्य आपण पार पाडुया.

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडावंदन करून आपण घरी येतो. या स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक म्हणून वावरतो. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला आयत्या पिठावर रेघोट्या ओढायला मिळाल्या आहेत. ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्या क्रांतिकारकाचा किती त्याग त्यामागे आहे हे आठवले तरी अंगावर शहारे येतात. अशा या क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यासाठी मी घेतलेले हे व्रत. प्रत्येक 15 ऑगस्टला क्रांतिवीरावर एक पुस्तक प्रकाशित करायचे हा नियम आहे. पहिल्या वर्षी ‘सावरकरांची पत्रकारिता’ हा विषय निवडला होता. त्यानंतर गेल्यावर्षी ‘मॅडम कामा’ यांच्यावर पुस्तक काढलं आणि यावर्षी हे अप्रतिम पुस्तक, मला प्रकाशित करायला मिळत आहे याचा मनोमन आनंद होत आहे, असेही त्यांनी सांगितले.”

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content