Homeपब्लिक फिगरमराठा आरक्षण संपवण्याचा...

मराठा आरक्षण संपवण्याचा सरकारचा डाव – प्रविण दरेकर

अनैसर्गिकरीत्या आलेल्या राज्य सरकारचा मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही निर्णय नाही. मराठा आरक्षणाबाबतीत भारतीय जनता पक्षाने जी भूमिका घेतली होती, तीच भूमिका आज सरकार मराठा आरक्षणासंदर्भात घेत नाही. तसेच भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देताना भाजपने सामाजिक संतुलन राखले होते. पण ते या सरकारकडून राखल्याचे दिसत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली. 

भाईदंर येथे भाजप वैद्यकीय आघाडी (प्रकोष्ठ) पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरात ‘महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण’ या विषयावर दरेकरांनी उपस्थितांना संबोधित केले. तेव्हा ते बोलत होते. राज्यातील विकासाचा बोजवारा उडाला असून सामाजिक संतुलन बिघडले आहे. अनैसर्गिकरित्या आलेल्या सरकारमध्ये ताळमेळ राहिलेला नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा अजून तसाच रेंगाळलेला आहे. सरकार सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षण हायकोर्टात टिकले तर सुप्रीम कोर्टात टिकवण्याची जबाबदारी कोणाची होती? सरकारची होती ना.. या आरक्षणासाठी सरकारने कोणते प्रकारचे नियोजन केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

आरक्षणाच्या निर्णयासंदर्भात सुप्रीम कोर्टात तारीख आली. पण तेथे सरकारचे प्रतिनिधीत्व करणारे वकील उपस्थित नव्हते. दस्तावेज न्यायालयात सादर करावे लागतात. पण त्यावेळी सरकारकडून योग्य दस्तावेज उपलब्ध झाले नाहीत. त्याचवेळी राज्य सरकारची मराठा आरक्षणासंदर्भातील निष्काळजीपणाची भूमिका स्पष्ट झाली असे दरेकर यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षण देत असताना भाजपने सामाजिक संतुलन राखले होते. ओबीसींचे आरक्षण राखून आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले होते. धनगर समाजाला एक हजार कोटी देण्याची भूमिका भाजपने घेतली होती. मराठा आरक्षण देताना आमच्या सरकारने ओबीसी समाज, धनगर समाजाची काळजी घेतली होती, सामाजिक संतुलन राखले होते. हीच भूमिका सरकार का घेत का नाही असा सवालही त्यांनी केला.

भाजप आतापर्यंत जनतेसाठी काम करत आले आहे. भाजपला काही मिळते यापेक्षा मला समाजाला काय द्यायचे या भावनेतून आपण सगळे पक्षासाठी काम करतो. केवळ समाजातून नाही तर महाराष्ट्रातून, देशातून चांगला संदेश जात दिला जात आहे अशी भावना त्यावेळी व्यक्त केली असे दरेकर यांनी त्यावेळी सागितले.

कोरोनासारख्या संकटाच्या काळात भाजपाच्या वैदयकीय आघाडीने युद्धपातळीवर काम केले. भाजपच्या माध्यमातून या आघाडीमधील सहभागी डॉक्टर व अन्य पदाधिकाऱ्यांनी कोरोनोच्या काळात केलेल्या कामामुळे हजारोंना जीवदान मिळाले या शब्दात दरेकर यांनी आघाडीच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी डॉ. अजित गोपछेडे, डॉ. बाळासाहेब हरपडे, डॉ. स्वप्नील मंत्री, डॉ. उज्ज्वला हाके, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. मेघना चौघुले, डॉ. अनुप मगर, डॉ. विकी, डॉ. गोविंद भताने आदी मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

‘एआय’ची कमाल; रोगांना रोखण्यासाठी मिळणार रामबाण इलाज!

भविष्यात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या साथीच्या आजाराला (पॅन्डेमिक) रोखण्यासाठी शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील पहिली 'युनिव्हर्सल' (सार्वत्रिक) लस तयार केली आहे. विशेष म्हणजे, या लसीचा मुख्य घटक पूर्णपणे एआयद्वारे...

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...
Skip to content