Homeचिट चॅटवाय-फाय नव्हे, तर...

वाय-फाय नव्हे, तर आता शिखरांवर पोहोचणार लाय-फाय नेटवर्क!

स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख ही संस्था लाइट फिडेलिटी या (लाय-फाय) तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेट कनेक्शन असलेली पहिली संस्था बनली आहे.

Li-Fi technology optical wireless communication interior visualization flat style concept web vector illustration. Office room and led lights data transfer. Creative people collection.

एनएव्ही वायरलेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडने (नावटेक) स्थानिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी भारताच्या सर्वोच्च उंचीच्या ठिकाणी असलेल्या लडाख येथील शैक्षणिक संस्थेत लाय-फाय नेटवर्कची स्थापना केली आहे. या लाय-फायमुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक हेतूंसाठी उपलब्ध विजेवर जलद आणि सुरक्षित इंटरनेट मिळणार आहे.

नाव वायरलेस टेक्नॉलॉजीज ही आशियातील लाय-फाय क्षेत्रातील एकमेव नोंदणीकृत कंपनी आहे. याबाबत बोलताना संबंधित संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष सोनम वांगचुक म्हणाले की, आमच्या कॅम्पसमध्ये नाविन्यपूर्ण लाय-फाय तंत्रज्ञानाचा वापर करून कायमस्वरूपी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची स्थापना पाहून आनंद झाला. यामुळे ऑनलाईन व्याख्याने आयोजित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे कौशल्य सुधारण्यासाठी संस्थेला फायदा होईल. हे तंत्रज्ञान पर्यावरणासही अनुकूल आहे.

लाय-फाय

प्रकल्पामागील हेतू स्पष्ट करताना नावटेकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी हार्दिक सोनी म्हणाले की, भारताच्या सर्वोच्च ठिकाणी असलेल्या शैक्षणिक संस्थेत लाय-फाय तंत्रज्ञान स्थापित केल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही या प्रकल्पासाठी संस्थेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता आणि ते अत्यंत जलद, सुरक्षित आणि स्वस्त इंटरनेट प्रदान करण्याच्या अशा अभिनव कल्पनेने प्रभावित झाले. सोनम वांगचुक यांच्या नेतृत्त्वाखाली, आम्ही संपूर्ण लडाख कव्हर करण्यासाठी एकत्र येऊ आणि या लाय-फाय नेटवर्कची संपूर्ण परिसरात जोडणी करू.

 

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content