Homeमुंबई स्पेशलमीरा जगन्नाथ आणि...

मीरा जगन्नाथ आणि स्नेहामध्ये होणार का भांडण?

बिग बॉस मराठी सिझन ३ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली.. स्पर्धक कोण असतील? घर कसे असेल? याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती. आणि रविवारी संध्याकाळी ७ वाजता महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री झाली. सोबत सिद्धार्थ जाधवने उत्तम साथ देत पुन्हा एकदा सगळ्याची मने जिंकली..

स्नेहा वाघ, मीनल शाह, अक्षय वाघमारे, मीरा जगन्नाथ, विकास पाटील, सुरेखा कुडची, गायत्री दातार यांचे एकापेक्षा एक परफॉर्मन्स सादर झाले. याचसोबत बिग बॉस मराठीच्या घरात सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेड संस्थेच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांची एंट्री झाली.

सोनाली पाटील यांची बिग बॉस मराठी सिझन ३च्या घरात पहिली एन्ट्री झाली आणि त्यानंतर एक एक करून १४ सदस्य बिग बॉस मराठीच्या घरात गेले. बिग बॉस मराठीचे आलीशान घर बघून सगळेच अवाक झाले..

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहिल्याच दिवशी झालं मीरा आणि जय यांच्यात होणारं भांडण.. तसंच मीरा आणि स्नेहामध्ये झालेली बाचाबाची. मीराने जयला सुनावले “जय, मला डोकं आहे”, तर स्नेहाने मीराला खडसावले “ही काय पद्धत आहे का बोलायची”?

घरामध्ये झालेला वाद असो वा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये झालेली पहिली नॉमिनेशन प्रक्रिया असो.. सगळेच चर्चेत असणार आहे. मीरा आणि स्नेहा तसेच मीरा आणि जयमध्ये वाद कशावरून झाला? पुढे काय झालं? हे आजच्या भागामध्ये कळेल..

पहिल्या नॉमिनेशनद्वारेच लढाईला प्रारंभ होणार आहे. सदस्यांचा पहिला दिवस कसा होता? पहिल्या नॉमिनेशन प्रक्रीयेमध्ये कोण कोण नॉमिनेट झाले, हे बघणं रंजक ठरणार आहे.. तेव्हा नक्की बघुया बिग बॉस मराठी सिझन ३, रात्री ९.३० वा., कलर्स मराठीवर..

Continue reading

निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज!

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या जंगलाचाही विपर्यास होत आहे. झाडे, नद्या आणि निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी निसर्ग अभ्यासक श्रीरंग फडके लिखित 'रानसावल्या' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात व्यक्त केले. निसर्ग...

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...
Skip to content