Homeचिट चॅटएनसीसी सुधारणा समितीत...

एनसीसी सुधारणा समितीत महेंद्रसिंह धोनी!

राष्ट्र उभारणीमध्ये एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेला अधिक प्रभावी योगदानासाठी सक्षम करण्याकरिता उपाय सुचवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने माजी खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित केली असून त्यात क्रिकेटपटू एम एस धोनी, महिंद्र समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड आदींचा समावेश आहे.

ही समिती छात्र सेनेच्या अधिक हितासाठी, एनसीसीच्या माजी विद्यार्थ्यांकडून हातभार लावण्यासाठी मार्ग सुचवणे, अशाच प्रकारच्या आंतरराष्ट्रीय युवा संस्थेतल्या उत्तम पद्धतींचा एनसीसीच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या दृष्टीने शिफारस करणे, बदलत्या काळानुरूप एनसीसी अधिक समर्पक करणे, राष्ट्र उभारणीमध्ये आणि विविध क्षेत्रात एनसीसी छात्रांना अधिक प्रभावी योगदानासाठी सक्षम करणे याकरीता विविध उपाययोजना सुचविणार आहे.

समितीचे सदस्य याप्रमाणे-

माजी खासदार बैजयंत पांडा (अध्यक्ष), खासदार कर्नल (नि.) राज्यवर्धन राठोड, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आनंद महेंद्र, महेंद्र सिंह धोनी, अर्थ मंत्रालयातले मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सन्याल, जामीया मिलीया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरू नजमा अख्तर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू प्रा. वसुधा कामत, भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय संघटन सचिव मुकुल कानिटकर, मेजर जनरल आलोक राज (नि.), ‘डिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे, एसआयएस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक ऋतुराज सिन्हा, वॉटर डॉट ओआरजीच्या मुख्य संचालन अधिकारी वेदिका भांडारकर, डाटाबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद शाह हे सर्व या समितीचे सदस्य आहेत. मयांक तिवारी समितीचे सदस्य सचिव असतील.

एनसीसी ही युवकांमध्ये शिस्त, धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन, निःस्वार्थ सेवा बाणवत त्यांचे चरित्र घडवणारी गणवेशधारी मोठी संस्था आहे. समाजातल्या सर्व क्षेत्रात नेतृत्त्व करण्याचे गुण असलेले, संघटीत, प्रशिक्षित आणि ध्येयाने प्रेरित युवक संघटीत करण्याचा याचा उद्देश आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content