Homeचिट चॅटभारतात या वर्षाअखेर,...

भारतात या वर्षाअखेर, 35 भूकंप निरीक्षण केंद्रे!

देशात या वर्षाच्या अखेरीस आणखी 35 भूकंप निरीक्षण केंद्रे उभारली जातील तसेच येत्या पाच वर्षांत, अशी आणखी 100 केंद्रे देशभरात निर्माण होतील, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल दिली.

स्वातंत्र्यानंतर म्हणजे गेल्या 65 वर्षांत, देशभरात केवळ 115 भूकंप निरीक्षण केंद्रे स्थापन होऊ शकली. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत, देशात भूकंप निरीक्षण केंद्रांच्या संख्येत मोठी वाढ होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय भू-मॅग्नेशियम आणि अवकाश शास्त्र- आयएजीए तसेच, आंतरराष्ट्रीय भूकंपशास्त्र आणि पृथ्वीच्या गर्भातील भौतिकशास्त्र संस्था- आयएएसपीईआयने आयोजित केलेल्या संयुक्त विज्ञान परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. भारतीय उपखंड, भूकंप, भूस्खलन, चक्रीवादळे, पूर, त्सुनामी अशा नैसर्गिक संकटासाठी प्रवण भाग मानला जातो. त्यामुळे अशा संकटांचा सामना करण्यासाठी मोदी सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे, असेही ते म्हणाले.

आयएजीए आणि आयएएसपीईआय च्या या संयुक्त विज्ञान सभेतून, या विषयावर संशोधन करणारे अधिकाधिक जागतिक संशोधक निर्माण होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भूगर्भात खोलवरच्या रचना आणि भू-मैग्नेशियम यातील परस्परसंबंध तसेच भूकंपकेंद्रात द्रवपदार्थाचा उपयोग, अशा विषयांवर, आंतरशाखीय अध्ययन केले जाऊ शकते. आयएजीए आणि आयएएसपीईआय यांनी 2021पासूनच ही संयुक्त परिषद सुरू केली आहे. भारत सरकारच्या पृथ्वीविज्ञान मंत्रालयाच्या पाठिंब्याने सीएसआयआर-एनजीआरआयने यंदा ही परिषद आयोजित केली आहे. या संयुक्त परिषदेत होणाऱ्या विविध मालिका सत्रात, पृथ्वी विज्ञान व्यवस्थेचे शास्त्र जाणून घेण्यासाठी नवनवे पैलू समोर येतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Continue reading

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...
Skip to content