Homeचिट चॅटआधार समुदाय पोहोच...

आधार समुदाय पोहोच शिबिरांचे यशस्वी आयोजन

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI)अंतर्गत आधार सेवा केंद्र (ASK), वाशी यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) यांच्या सहकार्याने १० आणि ११ मे २०२६ रोजी नवी मुंबईतल्या महापे आणि सीबीडी बेलापूर येथे विशेष आधार समुदाय पोहोच (Outreach) शिबिरे यशस्वीरित्या आयोजित केली. या शिबिरांचा मुख्य उद्देश स्थानिक व वंचित समुदायातील नागरिकांना त्यांच्या निवासस्थानाजवळ आधार संबंधित विविध सेवांची सुसुलभ उपलब्धता सुनिश्चित करणे हा होता. UIDAI ने डिजिटल समावेशन आणि नागरिक सुलभता यांना प्राधान्य देत अशाप्रकारच्या समुदाय-आधारित उपक्रमांद्वारे आधार सेवांना अधिक सर्वसमावेशक स्वरूप दिले आहे.

आधार

शिबिरांमध्ये होता या प्रमुख सेवांचा समावेश:

– लहान मुलांची नवीन आधार नोंदणी

– डेमोग्राफिक माहिती (नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादी) अद्ययावतीकरण

– मोबाईल नंबर लिंकिंग व अपडेट  

– बायोमेट्रिक अपडेट (हातांचे ठसे व आयरिस स्कॅन)  

या सर्व प्रक्रिया UIDAIच्या कठोर सुरक्षा नियमावली, पडताळणी प्रोटोकॉल आणि गोपनीयता मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्ण पालन करून पार पाडण्यात आल्या. विशेष म्हणजे, या शिबिरांमध्ये लहान मुलांच्या नवीन आधार नोंदणीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अनेक बालकांनी प्रथमच आधार नोंदणी व अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट पूर्ण केले. स्थानिक रहिवाशांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. आधार सेवा घराजवळ उपलब्ध झाल्याबद्दल नागरिकांनी UIDAIच्या ASK वाशी केंद्र, NHRC आणि TISSच्या टीमचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले. UIDAI सर्व नागरिकांना उच्च दर्जाची, सुरक्षित आणि सर्वसमावेशक डिजिटल ओळख सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content