Homeन्यूज ॲट अ ग्लांसरेल्वेत मेगाभरती! १२वी...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश आहे.

पदांचा तपशील (एकूण पदे: ११,५५८)

या भरतीची विभागणी दोन स्तरांवर करण्यात आली आहे:

  1. पदवीधर उमेदवारांसाठी (८,११० पदे):
  • गुड्स ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, ज्युनिअर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, सिनिअर क्लर्क कम टायपिस्ट आणि चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर.
    पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी.
  1. १२वी पास उमेदवारांसाठी (३,४४८ पदे):
  • कमर्शियल कम तिकीट क्लर्क, ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट आणि ट्रेन्स क्लर्क.
    पात्रता: ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा आणि सवलत
पदवीधर पदांसाठी: १८ ते ३६ वर्षे.
बारावी पास पदांसाठी: १८ ते ३३ वर्षे.

  • (वयोमर्यादेत एससी/एसटी उमेदवारांना ५ वर्षे आणि ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची सवलत दिली जाईल.)
रेल्वे

निवडप्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड दोन टप्प्यांतील संगणक आधारित परीक्षा (सीबीटी १ आणि सीबीटी २)द्वारे केली जाईल. त्यानंतर पदाच्या आवश्यकतेनुसार टायपिंग टेस्ट किंवा अ‍ॅप्टिट्युड टेस्ट घेतली जाईल आणि शेवटी कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय चाचणी होईल.

अर्ज शुल्क

सामान्य/ओबीसी प्रवर्ग: ५०० रुपये (परीक्षेनंतर ४०० रुपये रिफंड मिळतील).
एससी/एसटी/महिला/माजी सैनिक/ईडब्ल्यूएस: २५० रुपये (परीक्षेनंतर पूर्ण शुल्क रिफंड मिळेल).

महत्त्वाच्या बाबी आणि लिंक

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (रेल्वेच्या अधिकृत प्रादेशिक वेबसाईटवर).
अधिकृत वेबसाईट: https://www.rrbcdg.gov.in किंवा तुमच्या विभागाच्या (उदा. आरआरबी मुंबई) वेबसाईटवर भेट द्या.
सुधारणा: उमेदवारांनी अर्जात काही चूक केल्यास ‘करेक्शन विंडो’चा वापर करून ठराविक शुल्क भरून दुरुस्ती करता येईल.

महत्त्वाची टीप: इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. रेल्वेने रिक्त पदांच्या संख्येत आणि अर्ज करण्याच्या तारखांमध्ये वेळोवेळी बदल केल्याने अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content