Homeमुंबई स्पेशलआमची पुढची पिढी...

आमची पुढची पिढी आता मोठ्या जागेत जाणार!

गेल्या तीन पिढ्या आमच्या बी डी डी चाळीतील छोट्याशा जागेत गेल्या. आता आमची पुढची पिढी तरी मोठ्या जागेत जाईल, अशी आशा बी डी डी चाळीतील ७४ वर्षांच्या सविता पेवेकर यांनी व्यक्त केली.

गेली अनेक वर्ष संपूर्ण इमारत एका कुटुंबासारखी राहिली. एकमेकांच्या सुखदु:खात, अडचणीत एकमेकांना मदत केली. भविष्यातसुद्धा असेच मोठे कुटूंब मोठ्या जागेत राहील अशी प्रार्थना त्यांनी देवाकडे केली.

पिढी

बी डी डी चाळ ही एक संस्कृती आहे. इथून आजपर्यंत अनेक कलाकार रंगभूमीवर गेले. देशाला अनेक खेळाडू दिले. चाळ जरी असली तरी अनेक प्रतिभावंत या संस्कृतीतून घडले आणि मोठे झाले. आजपर्यंत भाडेकरू म्हणून राहिलेल्या सर्व रहिवाशांच्या या जागेचा पुनर्विकास होऊन यापुढे ते आपल्या हक्काच्या घराचे मालक होणार आहेत, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी सांगितले. बी डी डी चाळ ही मुंबापुरीची ओळख आहे. ती टिकली पाहिजे, असेही ते म्हणाले. 

ना म जोशी मार्ग, बीडीडी चाळ रहिवासी संघाचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे म्हणाले की,  मंत्रीमहोदय जितेंद्र आव्हाड स्वतः चाळीत राहिलेले असल्यामुळे येथील रहिवाशांची समस्या त्यांना जवळून माहित आहे. त्यामुळे या प्रकल्पाला त्यांच्या कार्यकाळात लवकरच गती येईल अशी आम्हा सर्व रहिवाशांना आशा आहे.

ना. म. जोशी मार्ग येथील रहिवाशांनी पुनर्विकासाला पाठींबा दिला आणि आज येथील पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील अर्ध्यापेक्षा जास्त रहिवाशांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन जवळच देऊ केलेल्या  संक्रमण शिबिरात स्थलांतर केले आहे. उर्वरित लोकांचे लवकरच शंकानिरसन करून त्यांचेही स्थलांतर  करण्यात येईल. तात्पुरते असले तरी उत्तम संक्रमण शिबीर राहण्यासाठी रहिवाशांना शासनाने दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.   

या बी.डी.डी. चाळींच्या पुनर्विकासाला काही मंडळी विरोध करीत आहेत. मात्र त्यांच्या सर्व मागण्या त्यांनी ऐकून घेऊन त्यांच्याशी योग्य असा संवाद साधून पुनर्विकासाचा मार्ग सुकर कसा होईल यावर लक्ष दिले. त्याचप्रमाणे स्वतः वेळोवेळी पुनर्विकासाच्या बाजूने आणि विरोधात असणाऱ्या लोकांशी संवाद साधून हा पुनर्विकास मार्गी लावण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईतील हा महाविकास आघाडीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प येथील रहिवाशांसाठी नक्कीच चांगला ठरेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content