सध्या देशात कोविड-१९च्या भीतीचे सावट कायम आहे. आपल्याला पुन्हा तिसऱ्या संभाव्य लाटेला सामोरे जावे लागू नये म्हणून सर्वत्र सावधगिरी बाळगली जात आहे. त्यातच रक्षाबंधनाचा सण जवळ येऊ लागला आहे. त्यामुळे रक्षाबंधनात अनेक बहिणींचा आपल्या भावांना ऑनलाईन राखी पाठवण्याकडे कल दिसत आहे.
हाच काळ ओळखून विविध कुरियर सेवांनी राख्या पाठविण्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन व्यवस्था केली आहे. या वर्षी रक्षाबंधनाचा सण आणखी खास बनवण्यासाठी श्री मारुती कुरिअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, या भारतातील अग्रगण्य कुरिअर आणि लॉजिस्टिक्स कंपनीने अनोखी ऑनलाईन आणि ऑफलाईन राखी बुकिंग आणि वितरण सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
देशभरात कोविड-१९चा धोका लक्षात घेता, सुरक्षित अंतर राखणे ही काळाची गरज आहे, हे पाहता कंपनीने राखी आणि चॉकलेट पॅकचे ऑनलाईन बुकिंग सुरू केले आहे आणि या सणाला ग्राहकांसाठी सुलभ व सुरक्षित वितरण करणार आहे.
या नवीन उपक्रमाबद्दल बोलताना श्री मारुती कुरियर सर्व्हिसेस प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक अजय मोकारिया यांनी सांगितले की, या वर्षी रक्षाबंधन सुरक्षित आणि संस्मरणीय बनवण्यासाठी अनोखी राखी ऑनलाईन बुकिंग आणि डिलिव्हरी सेवा सुरू करण्यात आम्हाला खूप आनंद होत आहे. सणासुदीच्या काळात ग्राहक जलद आणि सुरक्षित डिलिव्हरीसाठी उत्सुक असतात. हे लक्षात घेऊन लक्षात ठेवा, आम्ही त्यांच्यासाठी सर्वोत्तम सेवा घेऊन आलो आहोत. कोविड-१९च्या सध्याच्या आव्हानात्मक वातावरणात, आम्ही आरोग्य आणि अंतराच्या प्रोटोकॉलचे पालन करून राखीचे डिजिटल वितरण सुनिश्चित करण्यासाठी पूर्ण काळजी घेत आहोत.
टपाल विभागाने केली विशेष व्यवस्था
या वर्षी 22 ऑगस्ट 2021 ला राखीपौर्णिमा आहे. या प्रसंगी पोस्टाने राख्या पाठविण्यासाठी आणि या टपालाच्या सुरळीत वितरणासाठी टपाल विभागाने विशेष व्यवस्था केली आहे. टपाल खात्याच्या दिल्ली मंडळाचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, दिल्लीतून इतर राज्यांमध्ये पोस्टाने पाठविल्या जाणाऱ्या राख्यांसाठी 16 ऑगस्ट 2021पर्यंत आणि दिल्ली मंडळात पाठविल्या जाणाऱ्या राख्यांसाठी 17 ऑगस्ट 2021पर्यंत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
दिल्लीतील 34 महत्त्वाच्या टपाल कार्यालयांमध्ये आणि दिल्ली रेल्वेस्थानक आणि नवी दिल्ली रेल्वेस्थानक या 2 आरएमएस अर्थात रेल्वे टपाल सेवा कार्यालयांमध्ये विशेष टपाल काऊंटर उभारण्यात येत आहेत. शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांनी वेळेत राख्या पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

