Homeन्यूज अँड व्ह्यूजमहागाई शिगेला! 'आनंदाचा...

महागाई शिगेला! ‘आनंदाचा शिधा’ आचारसंहितेच्या कचाट्यात!!

खरंतर महागाईबाबत दिवाळीत लिहिण्यासारखे तसे काही नसतेच! परंतु दोनच दिवसांपूर्वी हिंदू, या वर्तमानपत्राने महागाईबाबत एक संपूर्ण पानभर आरखेन वगैरे देऊन जवळजवळ बत्तीच लावली आहे. ‘दोन वेळचे जेवण झपाट्याने महाग होत आहे, तर उत्पन्नात मात्र काहीच वाढ नाही, अशा आशयाचे शीर्षक त्याला होते. हे सर्व नॉर्मलच होतं. पण आता या घडीला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांचे उत्पन्नाचे आकडे अनायासे हाती लागत आहेत. सर्वसामान्यांचे उत्पन्न दिवसेंदिवस कमी वा काही ठिकाणी तर न्यूनतम श्रेणीत मोडत असताना आपल्या भावी लोकप्रतिनिधीचे सध्याचे उत्पन्न मात्र गेल्या दहा-बारा वर्षांत दहा-बारा पटीने वाढलेले त्यांनीच कबूल केलेले आहे.

नाहीतर सगळेच नेते सांगत असतात ‘झोली लेके आया हु..’ हिंदूने केलेल्या पाहणीत केवळ दोन वेळचे जेवण कसे व किती महागले आहे याचा तक्ताच दिलेला आहे. डाळभात जेवायचे म्हटले तरी डाळीचा भाव सामान्य माणसाच्या आवाक्यात नाही. वास्तविक डाळीचे महत्त्व सर्व जेवणात असते. या डाळी अनेक ठिकाणी १५० रु किलोच्या पुढे गेलेल्या आहेत. तेलाचे भाव तर कढीतल्या गरम तेलाप्रमाणे कडकडत आहेत. कांदा, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो या इतर वस्तूंच्या भावाचे तर विचारूच नका! उलट लोकप्रतिधीच्या उत्पनात मात्र ‘कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे परदेशाकडे..’ अशी अवस्था आहे.

निवडणूक आयोगाची ही कमाल आहे. राज्यातील गरिबांसाठीचा ‘आनंदाचा शिधा’ ही काही नवीन योजना नाही. तरीही कोट्यवधी गरीब जनतेला या दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ मिळणारच नाही. कुठल्या बोरुबहाद्दराने हा ‘आनंद’ रोखला याची मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी तातडीने शोधून काढावे व त्याला हाकलून द्यावे, अशी जनतेची भावना आहे .यावर विंदा कारंदीकर आठवतात-

“जळताना जळो। निदान ही भूक

प्रार्थना ही एक। करा आता

नागड्यानो उठा। उगवा रे सूड

देहाचीच चूड। पेटवोनी”

छायाचित्र मांडणी- प्रवीण वराडकर

Continue reading

रविवारी आनंद घ्या राधिका जोशी यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १५ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता राधिका जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उस्ताद खादिम हुसैन खाँ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम होईल. यावेळी तबल्यावर प्रणव गुरव तर संवादिनीवर सौमित्र क्षीरसागर...

‘रानसावल्या’चे शनिवारी प्रकाशन

निसर्गप्रेमी आणि अभ्यासक श्रीरंग फडके यांनी लिहिलेल्या ‘रानसावल्या’, या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी, १४ फेब्रुवारीला गोरेगाव पूर्व येथील नंदादीप विद्यालयातील डॉ. भानुबेन नानावटी कलाघर येथे होत आहे. संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहाय्यक आयुक्त...

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....
Skip to content