Homeन्यूज अँड व्ह्यूजमहागाई शिगेला! 'आनंदाचा...

महागाई शिगेला! ‘आनंदाचा शिधा’ आचारसंहितेच्या कचाट्यात!!

खरंतर महागाईबाबत दिवाळीत लिहिण्यासारखे तसे काही नसतेच! परंतु दोनच दिवसांपूर्वी हिंदू, या वर्तमानपत्राने महागाईबाबत एक संपूर्ण पानभर आरखेन वगैरे देऊन जवळजवळ बत्तीच लावली आहे. ‘दोन वेळचे जेवण झपाट्याने महाग होत आहे, तर उत्पन्नात मात्र काहीच वाढ नाही, अशा आशयाचे शीर्षक त्याला होते. हे सर्व नॉर्मलच होतं. पण आता या घडीला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांचे उत्पन्नाचे आकडे अनायासे हाती लागत आहेत. सर्वसामान्यांचे उत्पन्न दिवसेंदिवस कमी वा काही ठिकाणी तर न्यूनतम श्रेणीत मोडत असताना आपल्या भावी लोकप्रतिनिधीचे सध्याचे उत्पन्न मात्र गेल्या दहा-बारा वर्षांत दहा-बारा पटीने वाढलेले त्यांनीच कबूल केलेले आहे.

नाहीतर सगळेच नेते सांगत असतात ‘झोली लेके आया हु..’ हिंदूने केलेल्या पाहणीत केवळ दोन वेळचे जेवण कसे व किती महागले आहे याचा तक्ताच दिलेला आहे. डाळभात जेवायचे म्हटले तरी डाळीचा भाव सामान्य माणसाच्या आवाक्यात नाही. वास्तविक डाळीचे महत्त्व सर्व जेवणात असते. या डाळी अनेक ठिकाणी १५० रु किलोच्या पुढे गेलेल्या आहेत. तेलाचे भाव तर कढीतल्या गरम तेलाप्रमाणे कडकडत आहेत. कांदा, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो या इतर वस्तूंच्या भावाचे तर विचारूच नका! उलट लोकप्रतिधीच्या उत्पनात मात्र ‘कोटीच्या कोटी उड्डाणे, झेपावे परदेशाकडे..’ अशी अवस्था आहे.

निवडणूक आयोगाची ही कमाल आहे. राज्यातील गरिबांसाठीचा ‘आनंदाचा शिधा’ ही काही नवीन योजना नाही. तरीही कोट्यवधी गरीब जनतेला या दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ मिळणारच नाही. कुठल्या बोरुबहाद्दराने हा ‘आनंद’ रोखला याची मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी तातडीने शोधून काढावे व त्याला हाकलून द्यावे, अशी जनतेची भावना आहे .यावर विंदा कारंदीकर आठवतात-

“जळताना जळो। निदान ही भूक

प्रार्थना ही एक। करा आता

नागड्यानो उठा। उगवा रे सूड

देहाचीच चूड। पेटवोनी”

छायाचित्र मांडणी- प्रवीण वराडकर

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content