Homeकल्चर +'जय जय स्वामी...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका स्वामी समर्थांच्या जीवनातील चमत्कारिक प्रसंग आणि त्यांची अध्यात्मिक लीला उलगडण्यावर आधारित आहे. मालिकेने प्रेक्षकांच्या मनात भक्ती आणि श्रद्धेचा विशेष ठसा उमटवला असून स्वामी समर्थांच्या कथांचा गूढ आणि चमत्कारिक भाग प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.

या आठवड्यात तुम्ही पाहू शकता की, साक्षात महादेवाचे अंश असलेले कर्नाटकच्या मुरगोड गावचे स्वामीभक्त चिदंबर दिक्षित अक्कलकोटमध्ये येऊन एक महायज्ञ आयोजित करतात. या यज्ञादरम्यान एका विचित्र स्थितीत मरण पावलेल्या ब्राह्मणाला स्वामी समर्थ एका विलक्षण अद्भुत लीलेने जिवंत करतात. या घटनेनंतर हा महायज्ञ कसा पूर्ण होतो याची विलक्षण भक्तिमय रंजक गोष्ट. ही मालिका नित्यप्रति जास्त लोकप्रिय होत चालली आहे. स्वामी समर्थांच्या भक्तांच्या आयुष्यातील या लीला भक्तांना नवी ऊर्जा आणि अपार श्रद्धा प्राप्त करून देत आहेत.

Continue reading

नवज्योत सिंग सिद्धूची भाजपमध्ये घरवापसी?

पंजाबच्या राजकारणात मोठ्या फेरबदलाची चिन्हे असून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२७च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने खास 'मास्टरप्लॅन' तयार केला असून, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर...

अजिंक्यतारा मल्लखांब स्पर्धेत सुविद्या, समता, मुंबादेवी संघ चमकले!

मुंबईत मल्लखांब लव संघ, सुविद्या प्रसारक संघ आणि आर्किटेक्चर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली (पश्चिम) येथे "५वी अजिंक्यतारा मल्लखांब चषक स्पर्धा" उत्साही वातावरणात नुकतीच संपन्न झाली. ही स्पर्धा मल्लखांब खेळातील अनभिषिक्त सम्राट दत्ताराम दुदम यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते....

आता ‘बापूजी’ही सोडणार ‘तारक मेहता..’?

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि गेल्या १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (टीएमकेओसी) पुन्हा एकदा वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे. मालिकेतील सर्वात महत्त्वाचे पात्र 'बापूजी' म्हणजेच चंपकलाल जयंतीलाल गडा यांची भूमिका साकारणारे अभिनेते...
Skip to content