Homeमुंबई स्पेशलचला देऊया मदतीचा...

चला देऊया मदतीचा एक हात.. नगरसेवक संदीप पटेल

रत्नागिरी जिल्ह्यात सतत चाललेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर चिपळूणसारख्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपण सारेच समस्त चिपळूणकरांसाठी प्रार्थना करत आहोत. या प्रार्थनेसोबत आपण जर प्रयत्नांची साथ दिली तर समस्त चिपळूणवासियांना ह्याचा खूप मोठा आधार होईल. म्हणून आपण सर्वांनी लागणाऱ्या प्राथमिक वस्तू चिपळूणकरांसाठी दान करून त्यांना बळ देऊ, असे आवाहन गोरेगावातले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक संदीप पटेल यांनी केले आहे.

तौक्ते चक्रीवादळमुळे कोकणात झालेल्या नुकसानग्रस्त भागातील बांधवाकरिताही नगरसेवक पटेल यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टीच्या वॅार्ड क्र. ५८तर्फे मदतीचा हात देण्यात आला होता.

जनतेने मदतीसाठी लागणारे साहित्य जसे की, टूथ ब्रश, टूथपेस्ट, साबण (कपड्याचा/अंघोळीचा), पॅकिंग पिशव्या, गार्बेज बॅग, सॅनिटरी पॅड, टॉवेल, चादर, मच्छर अगरबत्ती, मेणबत्ती, माचिस, सुकाखाऊ (बिस्किट, फरसाण वगैरे), युज अँड थ्रो डिश, ताट, वाटी, लहान मुलांचे किट, ORS, चप्पल, डाळ, तांदूळ, मीठ, तेल, तिखट, गहू/तांदूळ पिठ, दूध पावडर, पिण्याच्या पाप्याच्या बाटल्या/बाटला व इतर गृहपयोगी वस्तू (भांडी) अशा  अत्यावश्यक वस्तू इत्यादी स्वीकारल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

साहित्य जमा करण्याचे ठिकाण

नगरसेवक संदीप दिलीप पटेल यांचे जनसंपर्क कार्यालय, सिद्धार्थनगर, गोरेगाव (प).

Continue reading

निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज!

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या जंगलाचाही विपर्यास होत आहे. झाडे, नद्या आणि निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी निसर्ग अभ्यासक श्रीरंग फडके लिखित 'रानसावल्या' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात व्यक्त केले. निसर्ग...

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...
Skip to content