Homeमुंबई स्पेशलचला देऊया मदतीचा...

चला देऊया मदतीचा एक हात.. नगरसेवक संदीप पटेल

रत्नागिरी जिल्ह्यात सतत चाललेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर चिपळूणसारख्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपण सारेच समस्त चिपळूणकरांसाठी प्रार्थना करत आहोत. या प्रार्थनेसोबत आपण जर प्रयत्नांची साथ दिली तर समस्त चिपळूणवासियांना ह्याचा खूप मोठा आधार होईल. म्हणून आपण सर्वांनी लागणाऱ्या प्राथमिक वस्तू चिपळूणकरांसाठी दान करून त्यांना बळ देऊ, असे आवाहन गोरेगावातले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक संदीप पटेल यांनी केले आहे.

तौक्ते चक्रीवादळमुळे कोकणात झालेल्या नुकसानग्रस्त भागातील बांधवाकरिताही नगरसेवक पटेल यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टीच्या वॅार्ड क्र. ५८तर्फे मदतीचा हात देण्यात आला होता.

जनतेने मदतीसाठी लागणारे साहित्य जसे की, टूथ ब्रश, टूथपेस्ट, साबण (कपड्याचा/अंघोळीचा), पॅकिंग पिशव्या, गार्बेज बॅग, सॅनिटरी पॅड, टॉवेल, चादर, मच्छर अगरबत्ती, मेणबत्ती, माचिस, सुकाखाऊ (बिस्किट, फरसाण वगैरे), युज अँड थ्रो डिश, ताट, वाटी, लहान मुलांचे किट, ORS, चप्पल, डाळ, तांदूळ, मीठ, तेल, तिखट, गहू/तांदूळ पिठ, दूध पावडर, पिण्याच्या पाप्याच्या बाटल्या/बाटला व इतर गृहपयोगी वस्तू (भांडी) अशा  अत्यावश्यक वस्तू इत्यादी स्वीकारल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

साहित्य जमा करण्याचे ठिकाण

नगरसेवक संदीप दिलीप पटेल यांचे जनसंपर्क कार्यालय, सिद्धार्थनगर, गोरेगाव (प).

Continue reading

श्री मावळी मंडळ कबड्डीः स्वराज्य स्पोर्ट्स, श्रीराम क्रीडा विश्वस्त अजिंक्य

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी ठाण्याच्या श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्ट्सची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख...

‘आठवणीतले बाळासाहेब’ व्याख्यानाने होणार जय महाराष्ट्र नगर व्याख्यानमालेचा शुभारंभ

यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी मुंबईच्या...

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...
Skip to content