Homeचिट चॅटचंद्रशेखर खैरनार यांना...

चंद्रशेखर खैरनार यांना ‘समाज दीपस्तंभ’ पुरस्कार

‘साहित्यसंपदा’, या साहित्यिकांच्या समूहातील संस्थापक वैभव धनावडे यांनी चंद्रशेखर सुरेश खैरनार यांना ‘समाज दीपस्तंभ’ हा पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे. संस्थेच्या आगामी संमेलनात तो त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

चंद्रशेखर खैरनार यांनी सेनादलात असताना तीन लढायांमध्ये सहभाग देऊन केलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना आठ सेनापदके मिळाली आहेत. गोवा मुक्ती, भारत-चीन युद्ध, बांगलादेश मुक्ती यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते विश्व हिंदू परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते. अनेक आदिवासी मुलांची आश्रमात काळजी

घेतली. त्यांना अन्न, वस्त्र, ज्ञान कसे मिळेल यासाठी ते झटले. जायंट्स इंटरनॅशनलचे फेडरेशनचे अध्यक्ष असताना संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शाखा त्यांनी प्रस्थापित केल्या. अनेक शिबिरे भरवून गरजूंसाठी रक्तदान, मोफत शस्त्रक्रिया, तपासणी, नेत्रदान आदी कार्य केले.

सैन्यदलातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी छायाचित्रणासाठी वेळ दिला. धुळे शहरात पहिल्यांदा कलर लॅब सुरु केली. नंतर एल.एल.बी. पदवी प्राप्त करून मुंबईतील मुल्ला अँड मुल्लासारख्या प्रतिष्ठित आस्थापनातून वकिली केली. 

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content