Homeमुंबई स्पेशलबनावट लस घेतलेल्या...

बनावट लस घेतलेल्या ३९० जणांना उद्या अधिकृत डोस!

मुंबईतल्या कांदिवली (पश्चिम)मध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलात खासगी स्तरावर बनावट लसीकरण होऊन फसवणूक झालेल्या नागरिकांना मुंबई महापालिकेकडून उद्या अधिकृत लस दिली जाणार आहे. त्यासाठी उद्या, शनिवारी कांदिवली (पश्चिम)मध्ये महावीर नगर परिसरातील ऍमिनिटी मार्केट महापालिका लसीकरण केंद्रावर सत्र आयोजित करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईत आढळलेल्या ९ बनावट लस प्रकरणातील आतापर्यंत शोधलेल्या नागरिकांची यादी पोलीसांकडून महापालिकेला प्राप्त झाली आहे. या नागरिकांना योग्यरित्या अधिकृत लस देण्यासाठी आवश्यक ती सर्व पडताळणी करुन कार्यवाही सुरू आहे.

कांदिवलीमध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलाने ३० मे २०२१ रोजी खासगीरित्या लसीकरण आयोजित केले होते. मात्र, सदर लसीकरण बनावट आणि अनधिकृत पद्धतीने झाल्याची बाब नंतर उघडकीस आली. त्याबाबत गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी चौकशीदेखील सुरू केली. त्याचे धागेदोरे हाती लागल्यानंतर अशाच रितीने एकूण ९ बनावट व अनधिकृत लसीकरणाचे प्रकार घडल्याचे आणि त्यात अनेक नागरिकांना बनावट / अनधिकृत लस दिल्याची प्राथमिक माहिती उघड झाली.

या लाभार्थ्यांना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे तर, काहींची कोविन पोर्टलवर नोंद केल्याचेदेखील निदर्शनास आले आहे. अनधिकृत आणि अनुचित पद्धतीने करण्यात आलेल्या या सर्व गोष्टींची पोलिसांनी सखोल चौकशी केली आहे.

पोलीस तपासानुसार ज्या नागरिकांना बनावट लस देण्यात आल्याचा संशय आहे, त्या नागरिकांची यादी पोलिसांनी महापालिकेकडे सोपविली आहे. कोविन संकेत स्थळावर भ्रमणध्वनी क्रमांकाच्या आधारे या नागरिकांची माहिती महापालिकेकडून पडताळण्यात येत आहे.

पडताळणीअंती आणि पोलीस तपासानुसार, खरी लस मिळालेल्या नागरिकांना विहित नियमानुसार कालावधी पूर्ण होताच (कोव्हॅक्सिन असल्यास २८ दिवसांनंतर / कोविशिल्ड असल्यास ८४ दिवसांनंतर) दुसरा डोस देण्यात येईल. ज्यांना बनावट लस देण्यात आली, त्यांना योग्य ती कार्यवाही करुन अधिकृत लस देण्यात येणार आहे.

बनावट आणि अनधिकृत पद्धतीने खासगी स्तरावर लसीकरण झालेल्या सर्व नागरिकांना न्याय्य व योग्य पद्धतीने अधिकृत लस देण्यासाठी मुंबई महापालिकेकडून आवश्यक तेथे राज्य आणि केंद्र सरकारकडूनदेखील मंजुरी घेण्यात येत आहे.

Continue reading

निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज!

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या जंगलाचाही विपर्यास होत आहे. झाडे, नद्या आणि निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी निसर्ग अभ्यासक श्रीरंग फडके लिखित 'रानसावल्या' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात व्यक्त केले. निसर्ग...

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...
Skip to content