Homeमुंबई स्पेशलकृपाशंकर सिंह पुन्हा...

कृपाशंकर सिंह पुन्हा मुंबईत सक्रिय!

उत्तर प्रदेशातल्या जौनपूरमधून भारतीय जनता पार्टीकडून खासदारकी मिळविण्यात अपयशी ठरलेले महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह पुन्हा महाराष्ट्रात सक्रिय झाले आहेत. विधानसभेच्या येत्या निवडणुकीतही आपल्या मुंबईतल्या परंपरागत सांताक्रूझ कलिना मतदारसंघातून भाग्य अजमविण्याची शक्यता आहे.

याकरीता कृपाशंकर सिंह यांनी तयारीही चालविली आहे. शनिवारी त्यांच्या तसेच काका बाप्टिस्ट उद्यानातल्या मॉर्निंग वॉकर्स यांच्या हस्ते काका बाप्टिस्ट उद्यान कालिना सांताक्रूझ पूर्व येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस उद्यानामध्ये १०० विविध देशी प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कृपाशंकर सिंह यांनी जौनपूरमधून भाजपाकडून निवडणूक लढवली होती.

रवींद्र वायकरांच्याही हस्ते झाले वृक्षारोपण

शनिवारीच लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी म्हणजेच अवघ्या ४८ मतांनी निवडून आलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनीही वृक्षारोपण केले. मुंबईतल्या त्यांच्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या जोगेश्वरी पूर्व येथील शहीद अशोक कामटे मनोरंजन मैदानात मुंबई महापालिकेच्या के पूर्व विभागाच्या मदतीने ५०० झाडे लावण्यात आली.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content