Tuesday, September 17, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटमुंबई-गोवा महामार्गावर उद्यापासून...

मुंबई-गोवा महामार्गावर उद्यापासून तीन दिवस अंशतः ब्लॉक

मुंबई-गोवा महामार्गावर कोलाडजवळील पुई येथे म्हैसदरा नवीन पुलाचे गर्डर बसवण्याच्या कामासाठी उद्या, ११ जुलैपासून १३ जुलैपर्यंत सकाळी ६ ते ८ या वेळेत आणि दुपारी २ ते ४ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. तरी या कालावधीत मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने केले आहे.

या काळात प्रवाशांनी पुढील पर्यायी मार्गाचा अवलंब करावा-

१) वाकण फाटा येथून भिसे खिंड-रोहा-कालाडमार्गे पुन्हा मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

२) वाकण फाटा येथून पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपूर-माणगाववरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

३) खोपोली-पाली-वाकण राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना पाली-रवाळजे-कोलाड किंवा पाली-रवाळजे-निजामपूर-माणगाववरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

या कालावधीत गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग-

१) कोलाड येथून कालाड-रोहा-भिसे खिंड-वाकण फाटा किंवा नागोठणेवरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

२) कोलाड येथून रवाळजे-पालीवरून वळवून वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

३) कोलाड येथून रवाळजे-पाली-वाकण फाटावरून वळवून मुंबई-गोवा महामार्गावरून मार्गस्थ होता येईल.

Continue reading

बुधवारी खुली राहणार भायखळ्यातली ‘राणीची बाग’!

मुंबईतल्या भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (म्हणजेच पूर्वीची राणीची बाग) येत्या बुधवारी, १८ सप्टेंबरला जनतेकरिता खुले राहणार आहे. त्याऐवजी हे उद्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध...

यापुढे ‘बाबू’ ठरवणार, सणवार कधी साजरे करायचे ते?

यापुढे मुहूर्त, रितीरिवाज, चालीरीती, परंपरा अशा सर्व बाबींना तिलांजली दिली जाणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मनात येईल त्याप्रमाणे या महाराष्ट्रातील जनता सण, उत्सव साजरे करेल असे एकूण चित्र दिसते. आज होणारी ईद असो किंवा गणेशोत्सव, सरकारी बाबू म्हणतील त्याप्रमाणे हे...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोलांटउडी! 

दारू घोटाळ्यात अडकलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटींवर कोणतेही भाष्य न करता जनतेचा कौल मागण्यासाठी आपण मुख्यमंत्रीपद सोडत असल्याचा आव आणत त्यांनी जनतेच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी...
error: Content is protected !!
Skip to content