Homeमुंबई स्पेशलक्रिकेटरसिक गेल्यानंतर मरीन...

क्रिकेटरसिक गेल्यानंतर मरीन ड्राइव्हवर सापडले ५ जीपभर जोडे

टी-२० क्रिकेट विश्वचषकविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी मरीन ड्राइव्हवर उसळलेल्या जनसागरानंतर गुरूवारी रात्रभर मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत तब्बल पाच जीप भरून चप्पल-बूट तसेच पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करण्यात आल्याचे वृत्त आहे.

पालिकेच्या ए विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सुमारे १०० कामगारांनी, स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांच्या मदतीने केलेल्या या कार्यवाहीतून एक कॉम्पॅक्टर आणि एक डंपर कचरा संकलित झाला. त्यासोबतच छोट्या पाच जीप भरून कचरा संकलित करण्यात आला. रात्री सुमारे ११.३०पासून सुरु झालेली ही कार्यवाही सकाळी ८ वाजेपर्यंत सुरू होती. त्यामुळे मॉर्निंक वॉकसाठी येणाऱ्या मुंबईकरांना सकाळी नेहमीप्रमाणे स्वच्छ मरीन ड्राईव्ह उपलब्ध झाला.

या स्वच्छता मोहिमेतून खाद्यपदार्थांचे वेष्टन (रॅपर्स), पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, यासह बूट, चप्पल आणि इतर वस्तूदेखील मोठ्या प्रमाणात संकलित करण्यात आल्या. या संकलित कचऱ्यापैकी सुमारे ५ जीप भरुन संकलित बूट, चप्पल व इतर पुनर्प्रक्रिया योग्य वस्तू इत्यादी क्षेपणभूमीवर न पाठवता त्या पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत.

मरीन ड्राइव्ह

टी २० क्रिकेट विश्वचषकविजेत्या भारतीय संघाच्या स्वागतासाठी मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरात बुधवारी दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत लाखोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. स्वागत सोहळा आटोपून ही गर्दी ओसरल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून संपूर्ण मरीन ड्राइव्ह परिसरात रात्रभर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेतून दोन मोठे डंपर आणि पाच लहान जीप भरून अतिरिक्त कचरा संकलित करण्यात आला.

मरीन ड्राइव्ह परिसरात दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार संपूर्ण रात्रभर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छता मोहीम राबवली. ए विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या देखरेखीखाली या संपूर्ण परिसरात स्वच्छता करण्यात आली.

Continue reading

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या...
Skip to content