Homeएनसर्कल‘नोमॅडिक एलिफंट’चा कालपासून...

‘नोमॅडिक एलिफंट’चा कालपासून मेघालयात प्रारंभ

भारत मंगोलियाचा १६वा संयुक्त युद्धसराव ‘नोमॅडिक एलिफंट’चा काल मेघालयातील उमरोई येथील फॉरेन ट्रेनिंग नोड येथे प्रारंभ झाला. हा युद्धसराव 16 जुलैपर्यंत चालेल. भारताच्या 45 जणांच्या पथकाचे प्रतिनिधित्व सिक्कीम स्काऊट्सची एका बटालियन तसेच अन्य शाखा आणि सेवा दलातील जवान करत आहेत. मंगोलियाच्या पथकाचे प्रतिनिधित्व मंगोलियन लष्कराच्या 150 क्विक रिअक्शन फोर्स बटालियनचे जवान करत आहेत.

‘नोमॅडीक एलिफंट’ हा वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग असून तो आलटूनपालटून मंगोलिया आणि भारतात आयोजित केला जातो. याआधीचा सराव मंगोलियात जुलै 2023मध्ये आयोजित केला गेला होता. ‘नोमॅडीक एलिफंट’ या युद्धसरावाच्या उदघाटनप्रसंगी मंगोलियाचे भारतातील राजदूत डाम्बजाविन गनबोल्ड व भारतीय सैन्यदलातर्फे 51 सबएरिया जीओसी मेजर जनरल प्रसन्न जोशी उपस्थित होते.

संयुक्त राष्ट्रसंघ मॅण्डेटअंतर्गत सातव्या प्रकरणातील सब कॉन्व्हेंशनल सिनॅरिओमधील घुसखोरीविरोधी मोहिमा चालवण्याच्यादृष्टीने दोन्ही देशांच्या संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे हे या युद्धसरावाचे उद्दिष्ट आहे. या सरावात निमशहरी व डोंगराळ भागातील मोहिमांवर भर दिला गेला आहे. या युद्धसरावात दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर, संयुक्त कमांड पोस्ट उभारणी, गुप्तसूचना व टेहळणी केंद्राची उभारणी, हेलिपॅड अथवा तत्सम धावपट्टीची सुरक्षा, छोट्या लढाऊ टीम्सना सीमापार पाठवणे आणि परत आणणे, विशेष हेलिकॉप्टर मोहिमा, वेढा व शोध मोहिमा,ड्रोनचा वापर तसेच शत्रूच्या ड्रोनला रोखणे इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश आहे.

‘नोमॅडीक एलिफंट’ या युद्धसरावात दोन्ही देशांना संयुक्त मोहिमांमध्ये उपयोगी येणारी आपली युद्धकौशल्ये सामायिक करता येतील. या युद्धसरावामुळे दोन्ही देशांच्या सैन्यदलांमध्ये सहकार्य सुलभ होईल. बंधुभाव निर्माण होईल तसेच संबंधही सुधारतील. यामुळे या दोन्ही मित्रदेशांमधील संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढीस लागेल व द्विपक्षीय संबंधातही अधिक सुधारणा होईल.

या युद्धसरावाच्या 16 जुलै 2024 रोजी होणाऱ्या समारोप समारंभात मंगोलियाचे सैन्यप्रमुख मेजर जनरल ग्यानब्याम्बा सुंरेव व भारतीय सैन्यदलाच्या 33 कोअर चे जीओसी लेफ्टनंट जनरल झुबीन ए मिनवाला उपस्थित राहणार आहेत.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content