लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याकरीता येत्या 20 मे रोजी मतदान होणार असून यामध्ये 13 मतदारसंघातल्या 264 उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या 13 मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात छाननीनंतर 301 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील 37 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 264 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
पाचव्या टप्प्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम संख्या पुढीलप्रमाणे:
धुळे- 18, दिंडोरी- 10, नाशिक- 31, पालघर- 10, भिवंडी- 27, कल्याण- 28, ठाणे- 24, मुंबई उत्तर- 19, मुंबई उत्तर-पश्चिम- 21, मुंबई उत्तर-पूर्व- 20, मुंबई उत्तर-मध्य- 27, मुंबई दक्षिण-मध्य- 15 आणि मुंबई-दक्षिण- 14.
या आहेत मुंबईतल्या प्रमुख लढती
उत्तर मुंबई- पीयूष गोयल (भारतीय जनता पार्टी) विरूद्ध भूषण पाटील (काँग्रेस)
उत्तर-पश्चिम मुंबई- अमोल कीर्तिकर (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरूद्ध रविंद्र वायकर (शिवसेना).
उत्तर-पूर्व मुंबई- नंदेश उमप (बहुजन समाज पार्टी) विरूद्ध मिहिर कोटेचा (भारतीय जनता पार्टी) विरूद्ध संजय पाटील (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे).
उत्तर-मध्य मुंबई- ॲड. उज्वल निकम (भारतीय जनता पार्टी) विरूद्ध वर्षा गायकवाड (काँग्रेस).
दक्षिण मुंबई- अरविंद सावंत (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरूद्ध यामिनी जाधव (शिवसेना).
दक्षिण-मध्य मुंबई- अनिल देसाई (शिवसेना,उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरूद्ध राहुल शेवाळे (शिवसेना).