Homeटॉप स्टोरी20 मेला होणार...

20 मेला होणार 264 उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याकरीता येत्या 20 मे रोजी मतदान होणार असून यामध्ये 13 मतदारसंघातल्या 264 उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या 13 मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात छाननीनंतर 301 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील 37 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 264 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

पाचव्या टप्प्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम संख्या पुढीलप्रमाणे:

धुळे- 18, दिंडोरी- 10, नाशिक- 31, पालघर- 10, भिवंडी- 27, कल्याण- 28, ठाणे- 24, मुंबई उत्तर- 19, मुंबई उत्तर-पश्चिम- 21, मुंबई उत्तर-पूर्व- 20, मुंबई उत्तर-मध्य- 27, मुंबई दक्षिण-मध्य- 15 आणि मुंबई-दक्षिण- 14.

या आहेत मुंबईतल्या प्रमुख लढती

उत्तर मुंबई- पीयूष गोयल (भारतीय जनता पार्टी) विरूद्ध भूषण पाटील (काँग्रेस)

उत्तर-पश्चिम मुंबई- अमोल कीर्तिकर (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरूद्ध रविंद्र वायकर (शिवसेना).

उत्तर-पूर्व मुंबई- नंदेश उमप (बहुजन समाज पार्टी) विरूद्ध मिहिर कोटेचा (भारतीय जनता पार्टी) विरूद्ध संजय पाटील (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे).

उत्तर-मध्य मुंबई- ॲड. उज्वल निकम (भारतीय जनता पार्टी) विरूद्ध वर्षा गायकवाड (काँग्रेस).

दक्षिण मुंबई- अरविंद सावंत (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरूद्ध यामिनी जाधव (शिवसेना).

दक्षिण-मध्य मुंबई- अनिल देसाई (शिवसेना,उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरूद्ध राहुल शेवाळे (शिवसेना).

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content