महाराष्ट्रात सध्या प्रचंड प्रमाणात उकाडा वाढला आहे. मुंबईही त्याला अपवाद नाही. कडक उन्हाळ्यामुळे जिथे माणसांची लाहीलाही होते तिथे पशु-पक्ष्यांची अवस्था काय होत असेल? उन्हाने व्याकूळ झालेल्या, तहानलेल्या पक्ष्यांना पाण्याचे दोन थेंब मिळावेत याकरीता मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतल्या विविध उद्यानांमध्ये पाण्याची अशी व्यवस्था करण्यात आली आहे.