Homeचिट चॅट४०० पारसाठी महाराष्ट्रात...

४०० पारसाठी महाराष्ट्रात भाजपाचे बूथ विजय अभियान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पानुसार या लोकसभा निवडणुकीत ४००पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने (भाजपा) रणनीती आखली आहे. त्यानुसार प्रत्येक बूथवर 370 मते वाढवण्यासाठी भाजपाने कालपासून राज्यभर सहा दिवसांचे ‘बूथ विजय अभियान’ राबवण्यास सुरूवात करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य समीर गुरव यांनी याबाबतची माहिती दिली.

या अभियानाचे स्वरूप याप्रमाणे-

समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य.

घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी थेट संपर्क साधणे.

प्रत्येक घर आणि वाहनावर स्टीकर.

लाभार्थींशी नियमित संपर्क.

प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपाचा झेंडा.

समाजातील विविध घटकांसाठी ५ समूह बैठका.

भाजपाविरोधी समजल्या जाणाऱ्या मतदारांच्या मतपरिवर्तनाचा प्रयत्न.

बूथपासून दूरवर राहाणाऱ्या मतदारांना मतदानाचे आवाहन.

Continue reading

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...
Skip to content