Homeबॅक पेजईव्हीएमशिवाय पंतप्रधान नरेंद्र...

ईव्हीएमशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंकूच शकत नाहीत!

ईव्हीएमशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक जिंकूच शकत नाहीत. ईव्हीएममध्ये मशीनमध्ये काही नाही. त्यातल्या कागदावर मते असतात. या कागदाची मोजणी होत नाही. आम्ही निवडणूक आयोगाला या कागदांची मोजदाद करायला सांगितली तर ते तयार नाहीत. इथेच सारी गोम आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज मुंबईतल्या शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत केली.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समापनानिमित्त इंडिया आघाडीच्या सभेत ते बोलत होते. आमची लढाई नरेंद्र मोदींशी नाही तर त्यांना चालवणाऱ्या शक्तीच्या विरोधात आहे. ही शक्ती मोदींना रोज काय करायचे ते सांगते. आज हे बोला, उद्या ते करा, परवा पाण्याखाली बसा.. तसे ते करतात. या शक्तीविरोधात आपल्याला एकजुटीने लढायचे आहे, असे ते म्हणाले.

इलेक्ट्रोलर बॉण्ड म्हणजे मुंबईतल्या रस्त्यांवरील फेरीवल्यांकडून गोळा करण्यात येणाऱ्या हफ्तावसुलीचे राष्ट्रीय स्वरूप आहे. चार प्रकारे ही खंडणीवसुली केली जाते. कंत्राटे द्या आणि मग खंडणी गोळा करा. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स मागे लावा आणि खंडणी गोळा करा. बोगस कंपन्या तयार करून खंडणी जमवा आणि खंडणी गोळा करा व नंतर कंत्राटे द्या, अशा या पद्धती आहेत, असे ते म्हणाले.

या सभेत बोलताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी अब की बार भाजपा तडीपारचा नारा दिला. नरेंद्र मोदींना ते व त्यांच्या खुर्चीपलीकडे परिवार आहे कुठे? कशाला हवेत ४०० पार? त्यांना घटना बदलायची आहे. भारत सरकार म्हणण्याऐवजी ते आता म्हणतात मोदी सरकार.. का देशाचे नावही आता बदलणार आहात का, असा सवालही त्यांनी केला.

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात इलेक्ट्रोलर बॉण्डमध्ये बोगस कंपन्यांचा वापर झाल्याबद्दल जाब विचारण्याचे आवाहन केले. ज्या कंपनीचा फायदाच २०० कोटींचा आहे ती कंपनी भाजपाला १३०० कोटींचा निधी देऊ कसा शकते, असा सवाल त्यांनी केला.

शरद पवार, तेजस्वी यादव, मेहबुबा मुफ्ती, फारूख अब्दुल्ला, कल्पना सोरेन, एम. के. स्टॅलिन आदींची यावेळी भाषणे झाली.

Continue reading

महाराष्ट्रात कोरडे हवामान सुरू!

आयएमडी बुलेटिननुसार, ओदिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांमधून आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारला आहे. आतापर्यंत देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. पुढील 2 दिवसांत देशाच्या उर्वरित भागातून मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. महाराष्ट्रातून मान्सून...

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...
Skip to content