Homeएनसर्कलसुदर्शन पटनायक यांचे...

सुदर्शन पटनायक यांचे ‘मेरा पहला वोट देश के लिये’.. 

‘मेरा पहला वोट देश के लिए’ या मोहिमेला देशभरात गती देण्याच्या प्रयत्नात ख्यातनाम वालुकाशिल्प कलाकार सुदर्शन पटनायक यांनी ओरिसात जगन्नाथ पुरीच्या सागर किनाऱ्यावर वालुकाशिल्प साकारले आहे. या शिल्पातून त्यांनी युवकांना तसेच मतदानात पहिल्यांदाच भाग घेत असणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीला मजबूत आणि समृद्ध करण्याचा संदेश दिला आहे.

पटनायक यांच्या कलेची प्रशंसा करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, हे वाळूवर साकारलेलं  शिल्प नसून प्रत्येक भारतीयाच्या मनावर उमटलेला ठसा आहे. आपल्या एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात मंत्रिमहोद म्हणतात की #MeraPehlaVoteDeshKeliye, मोहीम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदाराच्या मनामध्ये या लोकशाही प्रक्रियेचा भाग होण्याची अनोखी उत्सुकता जागी करत आहे. या भावनेची उत्कृष्ट उभारणी या वाळूवर झालेली आपण बघत आहोत.

‘मेरा पहला वोट देश के लिए’ ही मोहीम देशातील वेगवेगळ्या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राबवली जात आहे. तरुण मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावे आणि देशाच्या भल्यासाठी मतदान करण्याचे महत्त्व त्यांच्यापर्यंत पोहोचवावे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मोहिमेमुळे निवडणुकीचे महत्त्व आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत मतदान करण्याचा अभिमान या गोष्टी ठळक होत आहेत.

Continue reading

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...

महाराष्ट्रात कोरडे हवामान सुरू!

आयएमडी बुलेटिननुसार, ओदिशा आणि छत्तीसगडच्या काही भागांमधून आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारला आहे. आतापर्यंत देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी 85 टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. पुढील 2 दिवसांत देशाच्या उर्वरित भागातून मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. महाराष्ट्रातून मान्सून...
Skip to content