Homeएनसर्कलराजनाथ सिंह 5...

राजनाथ सिंह 5 मार्चला करणार ‘चोला’चे उद्घाटन!

भारतीचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह येत्या 5 मार्चला गोव्यात नौदल युद्ध महाविद्यालयाच्या नवीन अत्याधुनिक प्रशासन आणि प्रशिक्षण इमारतीचे उद्घाटन करतील. चोला राजवटीतील पराक्रमी सागरी साम्राज्याच्या स्मरणार्थ या आधुनिक इमारतीला ‘चोला’ असे नाव देण्यात आले आहे.

नौदल युद्ध महाविद्यालयाचा इतिहास

भारतीय नौदलाच्या मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना प्रगत व्यावसायिक लष्करी शिक्षण देण्यासाठी 1988मध्ये आयएनएस करंजा येथे नौदल युद्ध महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. 2010मध्ये या महाविद्यालयाचे नौदल युद्ध महाविद्यालय असे नामकरण करण्यात आले आणि 2011मध्ये गोव्यातील सध्याच्या ठिकाणी ते हलवण्यात आले. उच्च दर्जाच्या लष्करी शिक्षणासाठी एक प्रख्यात प्रतिष्ठित संस्था या दृष्टीकोनातून, सशस्त्र दलाच्या अधिका-यांना धोरणात्मक आणि परिचालन स्तरावर नेतृत्वासाठी तयार करणे हे महाविद्यालयाचे उद्दिष्ट आहे.

महाविद्यालय सागरी सुरक्षा अभ्यासक्रमदेखील आयोजित करते, ज्यामध्ये आपल्या सागरी शेजारी देशाचे संरक्षण दल अधिकारीदेखील सहभागी होतात आणि एका मुक्त, सुरक्षित आणि सर्वसमावेशक हिंद महासागर क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य करतात, ज्यातून आपल्या पंतप्रधानांचा ‘सागर’ दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो. नौदल युद्ध महाविद्यालय हे भारतीय नौदलाच्या युद्धकला आणि आर्क्टिक अभ्यासाचे उत्कृष्टता केंद्र देखील आहे.

‘चोला’ इमारत

शैक्षणिक सूचना, संशोधन आणि युद्ध खेळाशी संबंधित नौदल युद्ध महाविद्यालयाची ही इमारत चोल राजवटीच्या सागरी पराक्रमाने प्रेरित आहे. इमारतीच्या मध्यवर्ती भागामध्ये एक भित्तिचित्र कोरले आहे जे इ.स. 1025मधील हिंद महासागरातील राजेंद्र चोलाच्या श्रीविजय साम्राज्याच्या मोहिमेचे चित्रण आहे. इमारतीचे नाव भूतकाळातील भारताचा सागरी प्रभाव आणि वर्तमानात सागरी शक्ती म्हणून त्याचे पुनरुत्थान प्रदर्शित करून भूतकाळाला वर्तमानाशी जोडते.

ही इमारत GRIHA-IIIच्या निकषांनुसार बांधण्यात आली आहे. इमारतीच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये पर्यावरण विकास उपक्रमांसाठी उत्खनन केलेल्या मातीचा बांधकामात वापर; 10 लाख लिटरपेक्षा जास्त पावसाचे पाणी साठवण्याची क्षमता; 100KW सौर ऊर्जा निर्मिती; आणि हरित इमारत  मानके यांचा समावेश आहे: टिकाऊपणा आणि उर्जा कार्यक्षमतेचे पैलू इमारतीच्या रचना अभियांत्रिकी तत्त्वज्ञानाचा गाभा आहेत, आणि 100 वर्ष जुन्या वटवृक्षाला मुळापासून उपटून न टाकता त्याच्या सभोवती इमारत बांधली आहे.

प्रतिकात्मकपणे, या इमारतीमागे रेस मॅगोस येथील पोर्तुगीजांचा वसाहतवादी किल्ला झाकोळला जातो. याचे हे योग्य स्थान वसाहतवादी  भूतकाळातील अवशेष झटकून टाकण्याच्या भारताच्या संकल्पाचे प्रतीक आहे. तसेच ते भविष्यातील लष्करी नेत्यांना ‘जलमेव यस्य, बलमेव तस्य’ (ज्याचे समुद्रावर नियंत्रण तो सर्वात  शक्तीशाली) या म्हणीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या निःसंदिग्ध विश्वासाच्या निरंतर मूल्याची आठवण करून देईल.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content