Homeबॅक पेजबोरीवलीत जुन्या रेल्वेडब्यात...

बोरीवलीत जुन्या रेल्वेडब्यात साकारण्यात आले रेस्टॉरंट

पश्चिम रेल्वेच्या मुंबईतल्या बोरीवली स्थानकाबाहेरील जुन्या डब्याचे रेस्टॉरंटमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. त्याला ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ असे नाव देण्यात आले आहे. स्थानिक संस्कृतीच्या आधारे या रेस्टॉरंटची सजावट करण्यात आली आहे. नमकीन आणि मिठाईसाठी प्रसिद्ध असलेल्या हल्दीरामने या रेल्वे डब्यात आपले रेस्टॉरंट उघडले आहे. हे ‘हल्दीराम एक्सप्रेस रेस्टॉरंट’ म्हणूनही ओळखले जाईल.

रेस्टॉरंटमध्ये एक भव्य डायनिंग हॉल बांधण्यात आला आहे. उत्तर आणि दक्षिण भारतासह सर्व प्रकारचे पदार्थ यामध्ये उपलब्ध असतील. हल्दीराम एक्सप्रेस रेस्टॉरंटमध्ये विशेष आसनव्यवस्था आहे. हल्दीराम

फुड्स इंटरनॅशनलचे संचालक नीरज अग्रवाल यांनी सांगितले की, रेल्वे वाहतुकीच्या सुरुवातीच्या काळात सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आणि इतर आवश्यक सुविधा ट्रेनमध्येच उपलब्ध असतील. तसेच जेवणाच्या ताट, नाश्ता इत्यादी २४ तास उपलब्ध असतील.

उपाहारगृहातील कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करतील. आईस्क्रीम, भारतीय पदार्थ, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ रात्री 3 वाजेपर्यंत उपलब्ध असतील. या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात वापरण्यात येणारे डबे अनुभवायला मिळतील. यामध्ये जुन्या ट्रेनमध्ये असलेल्या राजेशाही साधनांचा आस्वाद घेण्याचा अनुभव मिळणार आहे. तरुणांना या अनुभवाची ओळख करून देण्यासाठी रेल्वेच्या डब्यात एक रेस्टॉरंट तयार करण्यात आले आहे. नीरज अग्रवाल म्हणाले की, हे रेस्टॉरंट केवळ शहरी लोकांसाठीच नाही तर प्रवाशांसाठीही अतिशय उपयुक्त ठरेल.

Continue reading

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...
Skip to content