Homeमुंबई स्पेशलरोहित पवार, राजेश...

रोहित पवार, राजेश टोपे यांच्यावरही गुन्हे दाखल करा!

दगडफेक करुन हिंसा भडकवण्याचे षडयंत्र रचणारे, कारखान्यात याचे नियोजन करणारे राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हे दाखल करुन, या सर्व प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी प्रविण दरेकर यांनी आज विधान परिषदेत केली. यावेळी विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा दरेकर यांनी उपस्थित केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकणाच्या दौर्‍यावर असताना, अमृत महोत्सवी की रौप्य महोत्सवी वर्ष हे माहिती नसणार्‍याला कानाखाली मारली असती या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्याबाबतीत केलेल्या वक्तव्यानंतर, मविआ सरकारने राणेंवर गुन्हे  दाखल करुन, तुरुंगात टाकले होते. मग आता उपमुख्यमंत्र्यांबाबतीत जरांगे अश्लाघ्य वक्तव्य करत असतील तर, या राज्यात सर्वांसाठी कायदा सारखा असला पाहिजे. त्यामुळे जरांगेंवरदेखील गुन्हा दाखल करुन, त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

रोहित

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर आम्हीही सोबतच राहिलेलो आहोत. पण लोकं जमली म्हणून डोक्यात हवा जाऊन अहंकार आला. आणि याला बघून घेईन, त्याला बघून घेईन, बामणी कावासारखी भाषा यांच्या तोंडी आली. हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. अशी भाषा खपवून घेतली जाणार नाही. याची चौकशी करुन, कारवाई झालीच पाहिजे अशी मागणीही दरेकर यांनी केली.

जरांगेंनी सांगिलं होते की, मी समाजाकडून एक रुपया घेणार नाही. कुणी वर्गणी गोळा करायची नाही. मग मोठमोठे मोर्चे निघाले, जेसीबीने पुप्षवर्षा करण्यात आली. या सभांसाठी लाखो रुपये झालेला खर्च, ट्रॅक्टरसाठी प्रत्येकी ३० हजार रुपये देण्यात आले. ते आले कुठून? मराठा आंदोलक आणि जरांगे यांच्या सहकारी संगिता वानखेडे यांनी सांगितले की, या आंदोलनाचा संपूर्ण खर्च शरद पवार यांनी केला. त्यांचे बॅनर, पोस्टरचा खर्चसुध्दा पवारांचेच नेते करत होते. एवढेच नाही तर, जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते. पण शरद पवारांचे जरांगेंना फोन येत होते आणि जरांगे पवारांचेच ऐकत होते, असे वानखेडे यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे शरद पवारांचे फोन जरांगेंना येत होते का?, जरांगे शरद पवारांच्या सांगण्यानुसार वागत होते का? याची चौकशी झाली पाहिजे. आणि या आंदोलनासाठी झालेल्या आर्थिक उलाढालीची चौकशीदेखील ईडीमार्फत करण्याची मागणीदेखील त्यांनी केली.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content