Homeबॅक पेज'भारत संजीवनी' ठरला...

‘भारत संजीवनी’ ठरला सर्वोत्कृष्ट सीएसआर उपक्रम

मायक्रोफायनान्स फर्मच्या भारत संजीवनी उपक्रमाला ‘बिल्डिंग इंडिया 2047 – टेक्नॉलॉजीज फॉर अ बेटर टुमॉरो’ या प्रतिष्ठेच्या शिखर परिषदेत नुकतेच गौरविण्यात आले.

चेन्नई, 19 फेब्रुवारी २०२४ – भारत फायनान्शिअल इन्क्लुजन लिमिटेड (BFIL’s) चा अग्रणी सीएसआर उपक्रम ‘भारत संजीवनी’ला आयआयटी मद्रासने ‘बिल्डिंग इंडिया 2047 – टेक्नॉलॉजीज फॉर अ बेटर टुमॉरो’ या त्यांच्या प्रतिष्ठेच्या शिखर परिषदेत सर्वोत्कृष्ट सीएसआर उपक्रम म्हणून सन्मानित केले. ‘टेक्नॉलॉजी-ड्रिव्हन सोशल इम्पॅक्ट’ (तंत्रज्ञान प्रणीत सामाजिक प्रभाव) या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करून, या पुरस्काराचे उद्दिष्ट ज्यांनी विस्तारीत आणि शाश्वत उपाय सुविधांद्वारे प्रचलित सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तांत्रिक उपाय सक्षम केले आहेत अशा कंपन्यांना सन्मानित करणे आहे.

तामिळनाडूचे माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवा मंत्री डॉ. पलानिवेल थियागा राजन यांनी टीटीजे सभागृह, आयआयटी मद्रास येथे आयोजित कार्यक्रमात मुख्य जन अधिकारी आणि सीएसआर प्रमुख किशोर सांबासिवम यांना पुरस्कार प्रदान केला.

भारत संजीवनी हा अनोखा आणि स्वदेशी सीएसआर उपक्रम ग्रामीण शेतकऱ्यांच्या दाराशी पशुधनाची काळजी कशी घ्यावी याची सेवा पुरवितो. ‘डॉक्टर-अॅट-डोअरस्टेप’ दृष्टीकोन अशा प्रकारचा पहिला मोबाइल ॲप-आधारित प्लॅटफॉर्म वापरतो. यावर कोणताही शेतकरी टोल-फ्री नंबरवर कॉल करू शकतो आणि एका निर्धारित कालमर्यादेत पशुधन उपचार, आपत्कालीन काळजी, लसीकरण, कृत्रिम फलन आणि पोषण यासाठी पात्र सेवा मिळवू शकतो. एकात्मिक आयटी प्लॅटफॉर्म आणि डॉक्टर आणि पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी वापरलेले मोबाइल ॲप वेळेवर आणि परिश्रमपूर्वक सेवांमध्ये मदत करते. पशुधन मालक आणि संबंधित उपजीविकेच्या उत्पन्नाला आधार देण्यासाठी या उपक्रमाचा जन्म झाला. हा उपक्रम गुणवत्तेची कमतरता आणि वेळेवर काळजी घेण्याच्या मुख्य समस्येचे निराकरण करतो. त्यामुळे उत्पन्नावर लक्षणीय परिणाम होतो आणि संभाव्य जीवितहानी टळते.

या कामगिरीवर भाष्य करताना, भारत फायनान्शिअल इन्क्लूजन लिमिटेडचे​​मुख्य जन अधिकारी आणि सीएसआर प्रमुख किशोर सांबशिवम म्हणाले की, आयआयटी मद्रास (प्रमुख आयआयटी पैकी एक) कडून हा पुरस्कार मिळवणारे पहिलेच असल्यामुळे BFILमध्ये आम्हाला खूपच सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे. २०१६मध्ये स्थापन झालेल्या भारत संजीवनीने ७ राज्यांमधील १५ लाखांहून अधिक शेतकरी आणि २० लाखांहून अधिक पशुधनांची सेवा केली आहे. गुरेढोरे आजारी पडल्यास गुरांना उपचारासाठी नेण्यात वाहतुकीवर मोठा खर्च येतो. अशा संकटकाळात या उपक्रमाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आम्ही भारतातील इतर राज्यांमध्ये हा उपक्रम वाढवण्यास उत्सुक आहोत.

आयआयटी मद्रासने दिलेली मान्यता भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेडची कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी आणि शाश्वत विकास यांच्याप्रति असलेली बांधिलकी अधोरेखित करते.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content