Homeचिट चॅटआमची एसएससी आता...

आमची एसएससी आता ज्येष्ठ नागरिकांच्या कळपात!

गोष्ट खरी आहे की आमची एसएससी आता साठ वर्षांची झाली. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांच्या कळपात आली. काय म्हणता? नीट कळलं नाही? जरा सविस्तर सांगा की राव! म्हणजे असं झालं की आम्ही SSC (एसएससी), माध्यमिक शालांत परीक्षेसाठी शाळेतून बाहेर पडलो त्या गोष्टीला आज साठ वर्षे पूर्ण होत आहेत.

कारण आमची एसएससीची बॅच ही १९६४ची. मात्र आता आम्ही “म्हातारा न इतुका अवघे पाऊणशे वयमान”! थोडक्यात सांगायचं तर आम्ही मुंबईच्या बालमोहन विद्यामंदिर या शाळेत १९६४ साली ११-अ या वर्गात होतो. म्हणूनच २०१४ साली आम्ही सारे जण एकत्र येऊन आमच्या एसएससीची पन्नाशी अर्थात सुवर्ण महोत्सव खूप उत्साहाने साजरा केला. या घटनेस आजमितीस ६० वर्ष पूर्ण झाली आहेत.

सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानंतरसुद्धा आम्ही (‘अ’ वर्गातील मुले-मुली) नित्यनेमाने अधूनमधून स्नेहसंमेलन घडवीत असतो. असेच एक स्नेहसंमेलन गतसाली ऑक्टोबर महिन्यात मिलिंद सामंततर्फे विलेपार्ले‌ येथे आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी, १० फेब्रुवारीला मोहन पराडकरने आपल्या निवासस्थानी आयोजित केले. या आमच्या स्नेहसंमेलनास १८-१९ जण येणारे होते. परंतु सर्वांचीच आता पंच्याहत्तरी सरली असल्याने वैयक्तिक, अपरिहार्य कारणामुळे काही जण येऊ शकले नाहीत. पर्यायाने आम्ही ११ जणच उपस्थिती देऊ शकलो.

असं असले तरी सारा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि एकमेकांसह गप्पागोष्टीत छानपणे रंगला. तो आनंद नक्कीच स्वागतार्ह होता. दुपारच्या सत्रात खास ऑर्डर देऊन बनवून घेतलेल्या उत्तम जेवणाचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेतला. सायंकाळी चहापान झाल्याने छान तरतरी आली. याप्रसंगी रवी ठाकूरने आपले पुढले स्नेहसंमेलन एप्रिलमध्ये करण्याचे सूतोवाच करून सर्वांना सुखद धक्का दिला. त्याच्या अर्धांगिनीनेदेखील याला दुजोरा दिला. म्हणजे तीन महिन्यानंतर पुन्हा सर्वांची गाठभेट होऊन या संख्येत उत्तम भर पडेल अशी आशा आहे. मात्र, मोहनकडील कार्यक्रम अतिशय सुंदर, खास आठवणीत राहण्यासारखा घडला हे नमूद केलेच पाहिजे.

– अशोक मोहिले, माहीम

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content