Homeटॉप स्टोरी.. म्हणून मंगळवारीच...

.. म्हणून मंगळवारीच अशोक चव्हाण झाले भाजपावासी!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा अनिश्चित झाल्यामुळे तसेच राज्यसभा निवडणुकीसाठी मतदार जाहीर करण्यात अडचण होऊ नये यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा भारतीय जनता पार्टीतला प्रवेश आज तातडीने उरकण्यात आला. अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असून उद्यापर्यंत जाहीर होणाऱ्या यादीत त्यांचे नाव असणार असल्याचे बोलले जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या गुरूवारी महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर येणार होते. यात त्यांचा छत्रपती संभाजी नगर येथे एक कार्यक्रमही होता. परंतु पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या दौऱ्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली. त्यातच राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना त्याचदिवशी पक्षप्रवेश देऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविणे शक्य होणार नाही. या साऱ्या बाबी लक्षात घेऊन आजच चव्हाण यांचा पक्षप्रवेश उरकून घेण्याचा निर्णय भाजपाच्या नेत्यांनी घेतला.

त्यानुसार दुपारी एक वाजल्यानंतर मुंबईत भाजपाच्या प्रदेश मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण तसेच त्यांचे समर्थक माजी आमदार अमर राजुरकर यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी चव्हाण यांनी रीतसर प्रवेशशुल्क देत पावती घेत प्रवेशातली कोणतीही कायदेशीर अडचण ठेवली नाही. त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसमधले जनाधार असलेले अनेक नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचे सांगितले. चव्हाण यांनी यावेळी भाजपाला मजबूत करण्यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण स्वीकारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content