Homeटॉप स्टोरी.. म्हणून मंगळवारीच...

.. म्हणून मंगळवारीच अशोक चव्हाण झाले भाजपावासी!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा अनिश्चित झाल्यामुळे तसेच राज्यसभा निवडणुकीसाठी मतदार जाहीर करण्यात अडचण होऊ नये यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा भारतीय जनता पार्टीतला प्रवेश आज तातडीने उरकण्यात आला. अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असून उद्यापर्यंत जाहीर होणाऱ्या यादीत त्यांचे नाव असणार असल्याचे बोलले जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या गुरूवारी महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर येणार होते. यात त्यांचा छत्रपती संभाजी नगर येथे एक कार्यक्रमही होता. परंतु पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या दौऱ्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली. त्यातच राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना त्याचदिवशी पक्षप्रवेश देऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविणे शक्य होणार नाही. या साऱ्या बाबी लक्षात घेऊन आजच चव्हाण यांचा पक्षप्रवेश उरकून घेण्याचा निर्णय भाजपाच्या नेत्यांनी घेतला.

त्यानुसार दुपारी एक वाजल्यानंतर मुंबईत भाजपाच्या प्रदेश मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण तसेच त्यांचे समर्थक माजी आमदार अमर राजुरकर यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी चव्हाण यांनी रीतसर प्रवेशशुल्क देत पावती घेत प्रवेशातली कोणतीही कायदेशीर अडचण ठेवली नाही. त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसमधले जनाधार असलेले अनेक नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचे सांगितले. चव्हाण यांनी यावेळी भाजपाला मजबूत करण्यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण स्वीकारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content