Homeकल्चर +शुभंकरोती साहित्य मंडळ संमेलनाच्या...

शुभंकरोती साहित्य मंडळ संमेलनाच्या अध्यक्षपदी लता गुठे!

शुभंकरोति साहित्य मंडळ, धुळे या संस्थेच्या वतीने धुळे येथे १ फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येत असलेल्या एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिका लता गुठे यांची निवड झाली आहे.

लता गुठे गेली पंधरा वर्षे साहित्य क्षेत्रामध्ये साहित्यिका, प्रकाशिका, संपादिका म्हणून कार्यरत आहेत. संतसाहित्य ते बालसाहित्य अशा विविध विषयांवर त्यांची एकूण 22 पुस्तकं प्रकाशित आहेत. मोहक युरोप (प्रवास वर्णन) ‘सोलमेट’, ‘शोध अस्तित्त्वाचा’ दोन कथासंग्रह ‘मना मना दार उघड’ वैचारिक विषयावरील पुस्तक, ‘संत चैतन्याचा मेळा’ संतसाहित्यावरील पुस्तक, ‘भाव-विभोर’ ललित लेखसंग्रह, ‘माझे प्रेरणास्रोत’ मुलाखतींचे पुस्तक ७ कवितासंग्रह ‘बिन भिंतीची शाळा’, ‘इटुकले पिटुकले, ‘चांदण बाग’, ‘गमडी गंमत’ असे बालकथा/ कवितासंग्रह ही साहित्यसंपदा त्यांनी लिहिली आहे.

भरारी प्रकाशनच्या माध्यमातून अडीचशेपेक्षा जास्त पुस्तकांची निर्मिती केली आहे ‘तार्‍यांचे जग’, ‘धमाल मस्ती’ दिवाळी अंकांचे सातत्याने बारा वर्ष संपादन केले आहे. माझं प्रेम आणि स्वप्न कळ्या या दोन दोन्ही मुद्रिकांची निर्मिती आणि गीतलेखन त्यांनी केले आहे. अनेक साहित्यिक उपक्रमाचे आणि साहित्य संमेलनाचे सातत्याने आयोजन तसेच देश विदेशात साहित्यिक कार्यक्रमांमध्ये सहभाग दिला आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या उज्जैनकर फाउंडेशन जळगाव या संस्थेच्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

लता गुठे ह्या विश्वभरारी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई जिल्हाध्यक्ष, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय विलेपार्ले शाखा कार्यवाह अशा विविध साहित्यिक सामाजिक संस्थांचा त्यांनी कार्यभार सांभाळला आहे.  विविध नामांकित संस्थांचे अनेक मान-सन्मान आणि पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

Continue reading

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...
Skip to content