Homeबॅक पेजसोमवारी राष्ट्रपती देणार...

सोमवारी राष्ट्रपती देणार 19 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, 22 जानेवारी 2024 रोजी विज्ञान भवन येथे होणाऱ्या पुरस्कार समारंभात असामान्य कामगिरीसाठी 19 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, 2024 प्रदान करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी 2024 रोजी, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी आणि राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई यांच्यासमवेत त्यांच्या संबंधित श्रेणींमधील असामान्य कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करतील आणि या बालकांशी संवाद साधतील.

कला आणि संस्कृती (7), शौर्य (1), नवोन्मेष (1), विज्ञान आणि तंत्रज्ञान (1), समाजसेवा (4) आणि क्रीडा (5) या क्षेत्रातील असामान्य कामगिरीसाठी देशातील सर्व प्रदेशांमधून निवडलेल्या 19 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, 2024 प्रदान केले जातील. 2 आकांक्षी जिल्ह्यांसह 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पुरस्कार विजेत्यांमध्ये 9 मुले आणि 10 मुली यांचा समावेश आहे.

बालकांच्या असामान्य कामगिरीसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) पुरस्कार केन्द्र सरकार प्रदान करते. 5 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांना त्यांच्या उत्कृष्टतेसाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात. पी. एम. आर. बी. पी. च्या प्रत्येक पुरस्कार विजेत्याला पदक आणि प्रमाणपत्र दिले जाते. या वर्षी महिला आणि बालविकास मंत्रालयाने प्रादेशिक वृत्तपत्रे आणि सर्व प्रमुख राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन नामांकने वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल नामांकनांसाठी 9 मे 2023 ते 15 सप्टेंबर 2023 या दीर्घ कालावधीसाठी खुले ठेवण्यात आले होते. माध्यमातील यासंदर्भातील  माहितीची चाचपणी आणि पडताळणी करण्यासाठी  गेल्या 2 वर्षांपासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात होता. पात्र उमेदवारांची शिफारस करण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची (एन. सी. पी. सी. आर.)देखील निवड करण्यात आली.

जिल्हा दंडाधिकारी आणि क्षेत्र तज्ञांसह अनेक स्तरांद्वारे दाव्यांचा खरेपणा तपासण्यात आला आणि पडताळणी करण्यात आली, त्यानंतर विविध शाखांमधील तज्ञांचा समावेश असलेली छाननी समिती स्थापन करण्यात आली.

संगीत नाटक अकादमी, केंद्रीय राखीव पोलीस दल, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग, भारतीय सार्वजनिक प्रशासन संस्था आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यासारख्या विविध क्षेत्रांतील राष्ट्रीय स्तरावरील स्वतंत्र तज्ञांनी, पडताळणी समितीच्या बैठकीनंतर निवडलेल्या माहितीची पुन्हा तपासणी केली. राष्ट्रीय निवड समितीने अंतिम निवडीसाठी निवडलेल्या बालकांच्या कामगिरीची तपासणी केली.

Continue reading

माऊलींच्या कृपेने आळंदीतच विठ्ठल दर्शन घडले!

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी यांच्या वतीने काल आयोजित दिवाळी पहाट संगीत महोत्सवात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित राहून पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनसेवेचा आस्वाद घेतला. याप्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, भाऊबीजेला विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला...

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यशासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१...

खारपाड जमीनीवरचा खजूर लागवडीचा प्रयोग कोकणातही उपयोगी?

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त, खारट शेतजमीनधारकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सावरकुंडला येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे- घनश्यामभाई चोडवडिया. त्यांच्या...
Skip to content