Homeएनसर्कलकपिल पाटील आज...

कपिल पाटील आज करणार ‘निरोगी गावे..’ कार्यशाळेचे उद्घाटन!

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आज, 18 जानेवारीला आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे ‘आरोग्यसंपन्न भविष्याच्या दिशेने निरोगी गावे’, या तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन होईल.

पंचायती राज मंत्रालय (एमओपीआर) आंध्र प्रदेश सरकारच्या पंचायत राज आणि ग्रामीण विकास विभागाच्या निकट सहकार्याने 18 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान संकल्पना 2: निरोगी गाव हा संकल्पनात्मक दृष्टिकोन स्वीकारून ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत विकास लक्ष्यांचे स्थानिकीकरण या विषयावर या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करत आहे.

चांगल्या सवयी; आरोग्याच्या मापदंडांवर देखरेख ठेवण्यासाठी पंचायतींची भूमिका, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांशी लढण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि ग्रामपंचायत विकास आराखडा (जीपीडीपी) मध्ये ग्राम आरोग्य योजनेचे एकात्मीकरण, अनुकरणीय धोरणे, दृष्टिकोन, आणि नाविन्यपूर्ण मॉडेल्सचे प्रदर्शन करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असेल.

ही कार्यशाळा सहकार्यासाठी, ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि निकोप भविष्याच्या उभारणीकरिता धोरण आखण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ प्रदान करते. शाश्वत विकास लक्ष्यांचे स्थानिकीकरण (एलएसडीजी) चे उद्दिष्ट जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी)चे स्थानिकीकरण करणे आणि तळागाळातील विशिष्ट आव्हाने आणि संधींना सामोरे जाणे हे आहे. एलएसडीजी ची संकल्पना 2 म्हणजेच निरोगी गाव ही आरोग्य आणि कल्याणावर भर देणाऱ्या खेड्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करते.

संकल्पना 2: निरोगी गाव या प्रतिष्ठित राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित झालेल्या पंचायतींनाही तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content