Homeएनसर्कलमरीन ड्राईव्हवर झाली...

मरीन ड्राईव्हवर झाली हवाई दलाची चित्तथरारक प्रात्यक्षिके!

भारतीय हवाई दलाने नुकतीच मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे हवाई प्रात्यक्षिकांसह विविध उपक्रमांचा जनसंपर्क कार्यक्रम आयोजित केला होता. हवाई दलाबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि भारतीय हवाई दल आणि स्थानिक समुदाय यांच्यातील संबंध अधिक दृढ करणे हा या जनसंपर्क कार्यक्रमाचा प्राथमिक उद्देश होता. हवाई दलाची कौशल्ये, क्षमता प्रदर्शित करणे, भारतीय हवाई दलाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि तरुणांना भारतीय हवाईदल करिअर म्हणून निवडण्यास प्रोत्साहित करणे हादेखील या कार्यक्रमाचा उद्देश होता. हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारच्या समन्वयाने आयोजित करण्यात आला होता.

नयनरम्य मरिन ड्राइव्हवर मुंबईकर भारतीय हवाई दलाच्या हवाई प्रात्यक्षिकांचे साक्षीदार झाले. अनेक हवाई तळांवरून उड्डाण करणारी  विमाने या प्रात्यक्षिकांमध्ये  सहभागी झाली होती. महाराष्ट्राचे  राज्यपाल रमेश बैस हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. अनेक नागरी आणि लष्करी मान्यवरही या कार्यक्रमात सहभागी झाले आणि हवाई प्रात्यक्षिकांचे साक्षीदार झाले.

हवाई कसरतींमध्ये  भारतीय हवाई दलाच्या प्रात्यक्षिक चमूचा समावेश होता. गिरगाव चौपाटीवर एएन -32मधून आकाशगंगा चमूच्या हवाई योद्ध्यांनी स्कायडायव्हिंग म्हणजेच विमानातून जमिनीच्या दिशेने उडी मारत अचूक पद्धतीने उतरून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सूर्यकिरण चमूच्या  प्रभावी हवाई प्रात्यक्षिकांनीही उपस्थितांना खिळवून ठेवले. सुखोई -30 एमकेआय  आणि सारंग हेलिकॉप्टरच्या कालबद्ध आणि समक्रमित प्रात्यक्षिकांनी भारतीय हवाई दलाची उत्कृष्टता  प्रदर्शित केली.

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content