Homeहेल्थ इज वेल्थलसीकरणामुळे नव्या कोरोनाची...

लसीकरणामुळे नव्या कोरोनाची चिंता नाही!

कोरोना विषाणूच्या जे एन 1 या सब वेरियंटमुळे घाबरण्याची गरज नाही. परंतु सतर्कता पाळणे गरजेचे आहे. कोरोना लसीकरणाने रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ .भारती पवार यांनी काल नागपूरमध्ये दिली.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था – एम्सची पाहणी केली आणि आढावा बैठकही घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि आभा कार्डच्या उपयुक्तेतेबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीवेळी मार्गदर्शन केलं. रुग्णांची माहिती त्यांचा आरोग्यविषयक इतिहास याचं संगणकीकरण केलं जात असल्याने फाईल्सची लांबलचक प्रक्रिया हद्दपार करता येऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासारख्या आपत्ती काळासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर दिला असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केले.

जनोपयोगी योजनांची माहिती एम्सने करून द्यावी आणि लोकांमध्ये जाणीव जागृती व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय फोनद्वारे समुपदेशन  देऊ केले जाऊ शकते त्याचादेखील रुग्णांना लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात आणि देशात मेडिकल कॉलेजची संख्या, गुणवत्तायुक्त शिक्षण आणि आरोग्यसेवा याबाबत केंद्रातर्फे देऊ करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

‘वसुधैव कुटुंबकम’ तत्वावर पुढील वाटचाल करीत उत्तम संशोधन आधारित मानवसेवा करायची आहे आणि आपल्या देशाला आरोग्यसेवेत आघाडीवर न्यायचे आहे असे आवाहनही भारती पवार यांनी केले. एम्स नागपूरचे संचालक डॉ. हनुमंता राव, वैद्यकीय अधीक्षक श्रीगीरिवार यांनी एम्सच्या विविध उपक्रमांची माहिती पवार यांना दिली.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content