Homeकल्चर +मध्य प्रदेशातल्या जलमहोत्सवास...

मध्य प्रदेशातल्या जलमहोत्सवास सुरूवात

भारतातील प्रमुख वार्षिक वॉटर कार्निव्हल असलेला जलमहोत्सव कालपासून मध्य प्रदेशातल्या इंदूरजवळील नयनरम्य हनुवंतिया जिल्ह्यात सुरू झाला आहे. मध्य प्रदेश पर्यटन मंडळ आणि सनसेट डेझर्ट कॅम्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जलमहोत्सव हा नवीन पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलची क्षमता दर्शविणारा प्रमुख कार्यक्रम आहे.

या जलमहोत्सवात पुन्हा एकदा हृदयद्रावक साहसी उपक्रम, चैतन्यपूर्ण सांस्कृतिक अनुभव आणि निसर्गाच्या कुशीत  आरामदायी मुक्काम यांचा अनोखा मिलाफ पाहयला मिळणार आहे. हा महोत्सव थरार आणि उत्साहाचा पर्याय आहे आणि ही आवृत्तीही त्याला अपवाद नाही. पर्यटक साहससाधक जेट स्की, स्पीड बोट, बनाना बोटराइड, बंपर राइड, हॉट एअर बलून, लँड पॅरासेलिंग, पॅरा मोटर यासह विविध उपक्रमांमध्ये सहभागीहोऊ शकतात.

संस्मरणीय आणि आरामदायी अनुभव मिळावा, यासाठी स्पर्धक आणि पर्यटकांसाठी भव्य तंबू नगरी  उभारण्यात आली आहे. हनुवंतियाच्या निसर्गसौंदर्याने नटलेले हे तंबू शहर- टेंट सिटी विलासआणि आरामाचे परिपूर्ण मिश्रण प्रदान करते, ज्यामुळे पाहुण्यांना साहसाने भरलेल्या  दिवसानंतर विश्रांती घेता येते.

जलमहोत्सव साहसाच्या पलीकडे आकर्षक आकर्षणांच्या लाइनअपसह विस्तारलेला आहे. सांगीतिक  कार्यक्रम, वीकेंड कार्यक्रम आणि वेलनेस अॅक्टिव्हिटीज एकूणच अनुभवात सांस्कृतिक समृद्धी आणि  विश्रांतीचा स्पर्श जोडतील. हा महोत्सव कुटुंबीय, मित्र परिवार आणि एकल प्रवाशांसाठी एक समग्र भेट  ठरेल.

यावेळी बोलताना पर्यटन व संस्कृती विभागाचे प्रधान सचिव तथा मध्य प्रदेश पर्यटन मंडळाचे  व्यवस्थापकीय संचालक शिव शेखर शुक्ला म्हणाले की, पीपीपी मॉडेलअंतर्गत मध्य प्रदेश पर्यटन मंडळ आणि सनसेट डेझर्ट कॅम्प  यांच्यातील यशस्वी सहकार्याचे जलमहोत्सव हे एक उत्तम उदाहरण आहे. या भागीदारीमुळे या भागातील पर्यटन वाढीस हातभार तर लागलाच, शिवाय नवीन ठिकाणांच्या  विकासासाठी एक शाश्वत मॉडेलही तयार झाले आहे. भारतातील सर्वात मोठा वॉटर कार्निव्हल म्हणून  जलमहोत्सव देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटकांना आकर्षित करत असतो. साहस, संस्कृती आणि  नैसर्गिक सौंदर्य यांचा अनोखा मिलाफ असलेल्या या कार्यक्रमाला अविस्मरणीय अनुभव घेऊ  इच्छिणाऱ्यांनी याला आवर्जून हजेरी लावावी.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content