Homeकल्चर +उमेश कुलकर्णी दिग्दर्शित 'वळू' मराठी...

उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘वळू’ मराठी ओटीटीवर!

महाराष्ट्रातला एक अविस्मरणीय कथा आणि कथेतील मजेदार पात्र असणारा चित्रपट ‘वळू’ आता २२ डिसेंबरपासून ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते उमेश कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून रोटरडॅम, आशियाई, वॉर्सा, कार्लोवी वेरी, रेकजाविक-आइसलँड, ला रोशेल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २००८मध्ये ‘वळू’ चित्रपटास सर्वोत्तम दिग्दर्शन आणि सर्वोत्तम छायांकन असे पुरस्कार मिळाले आहेत.

कुसवडे गावात वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथेनुसार गावकऱ्यांनी देवाला वाहिलेला ‘डुरक्या’ नावाचा वळू गावात धुमाकूळ घालतो. तेव्हा डुरक्याला पकडण्यासाठी गावातले सरपंच (डॉ. मोहन आगाशे) फॉरेस्ट ऑफिसर स्वानंद गड्डमवारांना (अतुल कुलकर्णी) बोलावतात. डुरक्याला पकडण्याच्या या धुमाकुळात गावात काय काय धमाल घडते हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटातील प्रमुख कलाकार अतुल कुलकर्णी, मोहन आगाशे, भारती आचरेकर, गिरीश कुलकर्णी, वीणा जामकर, दिलीप प्रभावळकर, निर्मिती सावंत, नंदू माधव, रेणुका दफ्तरदार, मंगेश सातपुते, अमृता सुभाष, सतीश तारे, चंद्रकांत गोखले, ज्योती सुभाष, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी आहेत. प्रख्यात छायाचित्रकार सुधीर पलसाने यांनी ‘वळू’चा ७० एमएम कॅनव्हास चित्रित केला असून कलादिग्दर्शन रणजित देसाई यांचे तर अत्यंत आकर्षक पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांनी दिले आहे.

मराठी चित्रपटांचा चेहरा बदलणारा आणि अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना अल्ट्रा झकासच्या माध्यमातून सादर करताना एक वेगळा उत्साह असून ओटीटीवर चित्रपटास नक्कीच भरभरून प्रतिसाद येईल अशी अपेक्षा आहे. असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि.चे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content