Homeमाय व्हॉईसया रेतीच्या धुलिकणांचे...

या रेतीच्या धुलिकणांचे करायचे तरी काय?

म्हणे मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषण आणि धुलिकण यांचे प्रमाण वाजवीपेक्षा वाढले आहे. त्वरित उपाययोजना करा असे साक्षात पंतप्रधान कार्यालयातून फर्मान आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासकट सर्वांचीच एकच धावपळ सुरू झालेली आहे. काही प्रमाणात प्रदूषणाचा स्तर कमीही झालेला दिसतो. परंतु पंतप्रधान कार्यालयाने आपल्या अख्त्यारितील मंत्रालयांनाही तशी ताकीद द्यायला हवी.

कालच एका ठिकाणी जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडीने घाटकोपर स्थानकावर उतरलो. फलाट क्रमांक दोनवर गेले अनेक दिवस काही काम चालू आहे. त्या फलाटावर अनेक ठिकाणी रॅबीट व रेतीचे ढीग दिसले. तेही उघडे… त्यावर ताडपत्री टाकण्याची तसदी त्या कंत्राटदाराने घेतलेलीच नव्हती. क्रमांक दोनवरून जलद गाड्या तसेच बाहेरगावी जाण्याऱ्या अतिजलद गाड्याही जात असतात हे मी सांगायला नको. जलद गाड्या जातेवेळी या रेतीचे धुलिकण किती वेगाने हवेत मिसळले जात असतील याचा विचारच केलेला बरा!

गाडी फलाटावर आल्यावर डब्यात शिरायचे की धुळीपासून स्वतःला वाचवायचे हा मोठा प्रश्नच प्रवाशांपुढे पडतो. अनेकवेळा विचार करण्यात गाडी चुकायचीही भीती असते! असेच रेतीचे आणि रॅबीटचे ढीग अनेक रेल्वेस्थानकात गेल्या अनेक दिवसांपासून पडून आहेत. ठाणे रेल्वेस्थानकाबाहेरही (पश्चिम) असा रेतीचा ढीग गेले 10 दिवस पडून आहे आणि तोही उघडाच… आता पंतप्रधान कार्यालयाने थेट रेल्वेमंत्र्यानाच फोन केला पाहिजे, असे अनेक नगरिकांनी या प्रतिनिधीला सांगितले.

Continue reading

माध्यमांना ठाकरेंच्या शिवसेनेचे का बरे वावडे?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज दाकल झाले. या प्रक्रियेत गेल्या चार दिवसांपासून विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत एक सवाल विचारला गेला- उबाठाचे प्रवक्ते पत्रकारांना वा वृत्तवाहिन्यांना उपलब्ध का नसतात? त्याबाबत निरीक्षणातून हाती आलेली...

‘केइएम’मध्ये मदत कक्षालाच हवी मदत! तपासायला डॉक्टर मिळाला तर उत्तमच!!

मुंबई महापालिकेच्या प्रमुख समजल्या जाणाऱ्या केइएम रुग्णालयात डॉक्टरांसहित कर्मचारी-कामगारांमध्ये सुमारे २० टक्के इतकी मोठी कपात करण्यात आली असून मोडकळीस आलेले स्ट्रेचर्स वगैरे सामान गोदमात ढकलून देण्यासाठीही कामगार नसल्याची संतापजनक माहिती हाती आली आहे. अपघात विभागातील डॉक्टरांची संख्या तर एक-दोन...

मुंबई बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड अंमली पदार्थांच्या फॅक्टरीमागे?

मुंबईच्या आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या समोरच्या बाजूसच असलेल्या घास गल्लीतील अमली पदार्थांचा कारखाना नार्कोटिक्स विभागाने उद्ध्वस्त केल्यानंतर गेले सुमारे पाच-सहा दिवस दक्षिणमध्य मुंबईतील अनेक भागांना भेटी दिल्यानंतर एक गोष्ट हळूहळू स्पष्ट होत आहे की, या अमली पदार्थांच्या व्यापार व कारखान्यांमागे मुंबईत...
Skip to content