Homeबॅक पेजधनगर समाजाच्या आरक्षणासाठी...

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकारचा स्पेशल टास्क फोर्स!

धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात तसेच धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे शिष्यवृत्तीसह वसतीगृहादी लाभ तातडीने देण्याच्या उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार एक विशेष टास्क फोर्स नियुक्त करणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे तसेच उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी धनगर समाजासह ब्राह्मण, बंजारा आणि गोवारी समाजातील काही प्रातिनिधिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी नागपूर विधान भवनात चर्चा केली. या बैठकीत धनगर समाजासाठी विशेष कृती दल स्थापन करून तातडीच्या उपाययोजना केल्या जातील आणि आरक्षणासंदर्भातही अहवाल तयार केला जाईल, असे ठरवण्यात आले.

उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस २०१४च्या विधानसभा निडणुकांच्या प्रचाराच्या कालखंडात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यावेळी बारामतीमधे घेतलेल्या जाहीर सभेत सत्तेवर आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल, असे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, पाच वर्षे सत्तेत राहूनही हे आश्वासन त्यांना पूर्ण करता आले नव्हते. त्यावरून मराठा आरक्षणावरील चर्चेतही विरोधी पक्षातील आमदारांनी फडणवीस यांना लक्ष्य केले. ही चर्चा काल रात्रीही उशिरापर्यंत सुरू होती.

धनगर

ही चर्चा विधानसभेत सुरू असतानाच मुख्यमंत्री शिन्दे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या चारही समाजांच्या काही संस्थांबरोबर चर्चा केली. त्यानंतर धनगर समाजाबद्दल टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय विधानसभेत जाहीर होण्याची शक्यता आहे.

ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन कतरण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. प्रामुख्याने संभाजीनगर भागातील ब्राह्मण संस्थांच्या प्रतिनिधींचा या बैठकीत अंतर्भाव होता, असे समजते. बंजारा समाजाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या आरक्षणामध्ये काही इतर जातीजमातींचे घटक फायदे घेत असल्याने त्याबद्दल सरकारने त्यांचे आरक्षण अबाधित ठेवावे, अशी मागणी होती. त्यावर सरकारने अपात्र असलेल्या किंवा आरक्षणात घुसलेल्या अन्य समाजाच्या लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.

गोवारी समाजाच्या काही स्थानिक मागण्या होत्या. त्या बैठकीतच मान्य करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Continue reading

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या...
Skip to content