Homeचिट चॅटदादर केटरिंग कॉलेजला...

दादर केटरिंग कॉलेजला 70 वर्षे पूर्ण!

मुंबईतील दादर केटरिंग कॉलेजला (इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट) 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका गौरवशाली सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात संस्थेचे माजी विद्यार्थी ॲनाबेल रॉड्रिग्स (1985 तुकडी) आणि डॉ. नितीन शंकर नागराळे (1995 तुकडी) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दादर केटरिंग कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या अधिकृत संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. आठवणींचा खजिना असलेले एक संकेतस्थळदेखील दादर केटरिंग कॉलेजच्या आजवरच्या वाटचालीचा उत्सव आहे. दादर केटरिंग कॉलेज हे आशियातील पहिले महाविद्यालय आहे ज्याने आदरातिथ्य अध्यापनाची 70 वर्षे पूर्ण केली आहेत.

या कार्यक्रमादरम्यान “डेलीकेसीज ऑफ ख्रिसमस” या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी – शेफ व्ही के अय्यर (1980 तुकडी), शेफ मनोज वसईकर (1985 तुकडी) आणि शेफ शॅनन लॉरेन्स (2010 तुकडी) यांनी या पाककला स्पर्धेत परिक्षक म्हणून काम केले. शेरॉन डिसोझा यांना आपल्या पाककला कलात्मकतेसह स्पर्धेत प्रथम क्रमांक, मारिया गोम्स यांना स्वादिष्ट पाककृतीद्वारे द्वितीय क्रमांक तर श्रुती फाटक यांनी उल्लेखनीय सादरीकरणासाठी तिसरा क्रमांक पटकावला.

यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुरेल गायन सादर केले आणि अनेक उत्साही नृत्याविष्कार सादर केले.

जमलेल्या सर्वांच्या आनंदासाठी कार्यक्रमस्थळी हस्तकला नमुने आणि ख्रिसमस मिठाईसह विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि पेये असलेले स्टॉल्स देखील लावण्यात आले होते.

Continue reading

‘संगीत शांतीब्रह्म’ने जिंकली रसिक प्रेक्षकांची मने!

संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीतनाट्य महोत्सव मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला. रसिकांच्या गर्दीने हा संगीतनाट्य महोत्सव विशेष रंगत गेला. ही संस्था गेली अनेक वर्षे संगीतनाटकांना पुनश्च वैभव प्राप्त करून देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करत...

शालेय मुलांसाठी विनाशुल्क कबड्डी उन्हाळी शिबीर

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे उन्हाळी सुट्टीमध्ये शालेय मुलांसाठी विनाशुल्क कबड्डी स्पर्धात्मक प्रशिक्षण शिबीर मुंबई शहर व उपनगरमधील विविध विभागामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सदर उपक्रमाचा शुभारंभ कुर्ला-पश्चिम येथील गांधी मैदानात २५ एप्रिलपासून होणार आहे. नवोदित खेळाडूंना तंत्रशुध्द कबड्डी खेळाची...

मतदारसंघाच्या पुनर्रचनेमागे मोदी सरकारचा धूर्त डाव!

जनगणनेचा अहवाल २०२७मध्ये पूर्ण होणार आहे. घटनेतीलसंबंधीत कलमाप्रमाणे अनुसूचित जाती-जमाती व इतर समाजांना यथायोग्य प्रतिनिधित्व देण्याची तरतूद यामध्ये असताना वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या अहवालाऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या अहवालावर आधारित विधेयक, २९ एप्रिलपूर्वीच मंजूर करण्याचा घाट मोदी सरकार कशाकरिता घालत आहे असा सवाल...
Skip to content