Homeचिट चॅटमहामानवाला अभिवादन करा...

महामानवाला अभिवादन करा शैक्षणिक साहित्य अर्पण करून..

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी शैक्षणिक साहित्य अर्पण करून अभिवादन करावे, असे आवाहन ‘एक वही एक पेन’ अभियानाचे प्रणेते, ज्येष्ठ पत्रकार राजू झनके यांनी केले आहे. तशा आशयाचे निवेदनही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिले आहे.

समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून महामानवाला वह्या, पेन, पुस्तकांची मानवंदना द्यावी, असा उपक्रम मागील नऊ वर्षांपासून ‘एक वही एक पेन’ अभियानाच्या माध्यमातून राबविला जातो. महापरिनिर्वाण दिन, महापुरुषांची जयंती उत्सव तसेच गणेशोत्सवासारख्या सर्व सार्वजनिक उत्सवातदेखील जनतेने शैक्षणिक जागर करून गरजू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवावा, असे आवाहन ते सातत्याने करतात आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी या आवाहनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला जातो.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले शिक्षण घेतले. परदेशात जाऊनदेखील त्यांनी अनेक पदव्या संपादन केल्या. देशाला सर्वोच्च संविधान दिले. वंचित घटकांना आरक्षणाचा अधिकार दिला. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन कोलंबिया विद्यापीठाने जगातील सर्वात विद्वान व्यक्ती म्हणून त्यांचा पुतळा विद्यापीठाच्या आवारात उभारला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही डॉ. आंबेडकर यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत शिक्षणाची कास सोडली नाही. ते आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगले. समाजालाही त्यांनी शिक्षण घेण्याचा मूलमंत्र दिला. त्यामुळे त्यांना हार-फुले वाहून अभिवादन करण्यापेक्षा वह्या, पेन, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्याने अभिवादन करणे हीच त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजली राहणार असून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांनी ही सूचना स्वीकारून समाजाला शिक्षणाप्रती सकारात्मक संदेश द्यावा, असे आवाहनही झनके यांनी या निवेदनाद्वारे केले आहे.

Continue reading

‘संगीत शांतीब्रह्म’ने जिंकली रसिक प्रेक्षकांची मने!

संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीतनाट्य महोत्सव मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला. रसिकांच्या गर्दीने हा संगीतनाट्य महोत्सव विशेष रंगत गेला. ही संस्था गेली अनेक वर्षे संगीतनाटकांना पुनश्च वैभव प्राप्त करून देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करत...

शालेय मुलांसाठी विनाशुल्क कबड्डी उन्हाळी शिबीर

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे उन्हाळी सुट्टीमध्ये शालेय मुलांसाठी विनाशुल्क कबड्डी स्पर्धात्मक प्रशिक्षण शिबीर मुंबई शहर व उपनगरमधील विविध विभागामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सदर उपक्रमाचा शुभारंभ कुर्ला-पश्चिम येथील गांधी मैदानात २५ एप्रिलपासून होणार आहे. नवोदित खेळाडूंना तंत्रशुध्द कबड्डी खेळाची...

मतदारसंघाच्या पुनर्रचनेमागे मोदी सरकारचा धूर्त डाव!

जनगणनेचा अहवाल २०२७मध्ये पूर्ण होणार आहे. घटनेतीलसंबंधीत कलमाप्रमाणे अनुसूचित जाती-जमाती व इतर समाजांना यथायोग्य प्रतिनिधित्व देण्याची तरतूद यामध्ये असताना वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या अहवालाऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या अहवालावर आधारित विधेयक, २९ एप्रिलपूर्वीच मंजूर करण्याचा घाट मोदी सरकार कशाकरिता घालत आहे असा सवाल...
Skip to content