Homeन्यूज अँड व्ह्यूजनागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत...

नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती मुर्मू झाल्या सहभागी!

महाराष्ट्रातील नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 111व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नुकत्याच सहभागी झाल्या.

कोणत्याही देशाच्या विकासात, संशोधन आणि नवोन्मेष महत्त्वाची भूमिका बजावतात, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन देत आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या विद्यापीठातील प्राध्यापक सदस्यांना भारतीय पेटंट कार्यालयाने 60 हून अधिक पेटंट मंजूर केल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांमध्ये स्टार्ट-अप संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठात इनक्युबेशन सेंटर आहे. स्थानिक समस्या आणि गरजा लक्षात घेऊन नवोन्मेष आणि संशोधन करण्याचे आणि त्या नवकल्पनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यी आणि शिक्षकांना केले.

आज संपूर्ण जग हे एक जागतिक गावच झाले आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. कोणतीही संस्था जगापासून तुटून राहू शकत नाही. त्यांनी नागपूर विद्यापीठाला आंतरशाखीय अभ्यास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. संशोधन आणि नवोन्मेष एकमेकांशी सामायिक करूनच आपण जगासमोरील आव्हानांचा सामना करू शकतो यावर त्यांनी भर दिला.

कोणत्याही संसाधनांचा उपयोगही केला जाऊ शकतो किंवा त्याचा गैरवापरही केला जाऊ शकतो असे तंत्रज्ञानाच्या वापराबाबत बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या. तंत्रज्ञानाच्या बाबतीतही हेच लागू होते. जर आपण त्याचा योग्य वापर केला तर तो देशासाठी आणि समाजासाठी फायदेशीर ठरेल आणि जर आपण त्याचा गैरवापर केला तर तो मानवतेसाठी हानिकारक ठरेल. आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपले जीवन सोपे करत आहे. पण डीपफेकसाठी त्याचा वापर करणे हा समाजासाठी धोका आहे. नैतिक शिक्षण आपल्याला मार्ग दाखवू शकते असे त्यांनी सांगितले.

औपचारिक पदवी मिळवणे हा शिक्षणाचा शेवट नाही, विद्यार्थ्यांनी जिज्ञासू राहिले पाहिजे आणि शिकत राहिले पाहिजे. आज  तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत, तेव्हा सतत शिकत राहणे आणखी महत्त्वाचे ठरते असे राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले.

विद्यार्थी हे देश आणि समाजाची संपत्ती आहेत. भारताचे भविष्य त्यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्या आयुष्यात प्रतिकूल परिस्थिती येऊ शकते परंतु त्यांनी त्यांस घाबरू नये. ज्ञान आणि आत्मविश्वासाने अशा परिस्थितींचा सामना करावा, प्रियजनांच्या संपर्कात राहावे आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवावा असा सल्ला राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना दिला.

Continue reading

आज दुपारी 12 वाजता साजरा करा श्रीराम जन्मोत्सव!

आज श्रीरामनवमी! श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या तिथीला नेहमीपेक्षा 1 हजार पटीने कार्यरत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम।’ हा नामजप जास्तीतजास्त करावा. श्रीराम म्हणजे अनेक भाविकांची श्रद्धाज्योत! धर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा...

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....
Skip to content