Homeचिट चॅटनवी मुंबईत 'स्वच्छ...

नवी मुंबईत ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’!

सणासुदीचा हंगाम जवळ आला असताना, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) नेतृत्त्वाअंतर्गत ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ ही देशव्यापी मोहीम विशेष प्रकाशात येत आहे, जी नागरिकांना स्वच्छ आणि हरित पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करत आहे.

नवी मुंबईकर या चळवळीला मनापासून स्वीकारत असून नवी मुंबईत शॉपिंग मॉल्समधून सुरू केलेल्या सेल्फी मोहिमेत सक्रिय सहभाग घेत आहेत. हा अनोखा उपक्रम ग्राहकांना मॉल्समध्ये जाण्यासाठी आकर्षित करत आहे.

दुसऱ्या स्वच्छ भारत मिशन-शहर अभियान (2.0) अंतर्गत ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ मोहिमेचा एक भाग असलेल्या स्वच्छ दिवाळी स्वाक्षरी मोहिमेसाठी खरेदीदारांना स्वाक्षरी मोहीमेत (साइन अप) सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानंतर ते मॉलमधील सेल्फी पॉइंट्सवरून स्वच्छ दिवाळी सेल्फीद्वारे आपली पर्यावरणाबाबत जागरूकता आणि स्वच्छता यासह दिवाळी साजरी करण्याची आपली वचनबद्धता प्रदर्शित करु शकतात. नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ दिवाळी स्वाक्षरी मोहिमेसाठी साइन अप केलेल्या नागरिकांना खरेदीसाठी सवलतीच्या दरातील भेटकूपन ही दिली जात आहेत, ज्यामुळे निवड करणाऱ्यांमधे सकारात्मक मनोभावना निर्माण होत आहे. हा एक अनोखा उपक्रम असून त्यात नागरिकांचा समावेश असून स्वच्छतेच्या वचनबद्धतेसह उत्सवाचे प्रतिबिंब त्यातून दिसून येत आहे.

ही मोहीम केवळ नागरिकांना जनआंदोलनात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत नाही तर स्वच्छ दिवाळीसाठी त्यांच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व म्हणूनही काम करत आहे. या प्रयत्नात नवी मुंबईकर एकत्र आल्याने, स्वच्छ दिवाळी ‘शुभ दिवाळी’ ही केवळ मोहीम बनली नाही तर ती हरीत, स्वच्छ आणि अधिक शाश्वत पध्दतीने सणासुदीचे दिवस साजरे करण्याच्या सामूहिक चळवळीत बदलले आहे.

Continue reading

एलआयसीची ग्राहक आणि एजंटसाठी दोन स्वतंत्र मोबाईल ॲप लॉन्च!

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू यांनी काल मुंबईत एलआयसीचे नवीन ग्राहक ॲप (मायएलआयसी) आणि विक्री मध्यस्थांसाठीचे (एजंट) मोबाईल ॲप (सुपर सेल्स साथी) यांचे अनावरण केले. 26 कोटींहून अधिक पॉलिसी आणि भारतातील सर्वात व्यापक विमा पदचिन्हासह...

‘पेड दर्शन’साठी मंदिरे, पैशांसाठी थाटलेली दुकाने आहेत का?

पैशांअभावी दर्शन नाकारले जाणे हा त्यांच्या श्रद्धेचा अपमान आहे आणि संविधानाने दिलेल्या मूलभूत घटनात्मक धार्मिक अधिकारावर आणलेली गदा आहे. केवळ उत्पन्नवाढीचा विचार करण्यासाठी मंदिर हे एखादे व्यावसायिक आस्थापन वा दुकान आहे का?, असा सवाल करत मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक...

‘संगीत शांतीब्रह्म’ने जिंकली रसिक प्रेक्षकांची मने!

संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीतनाट्य महोत्सव मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला. रसिकांच्या गर्दीने हा संगीतनाट्य महोत्सव विशेष रंगत गेला. ही संस्था गेली अनेक वर्षे संगीतनाटकांना पुनश्च वैभव प्राप्त करून देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करत...
Skip to content