Homeचिट चॅटमहाराष्ट्र काँग्रेसच्या मीडिया...

महाराष्ट्र काँग्रेसच्या मीडिया विभागाला राष्ट्रीय ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार प्रदान!

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाला सर्वात वेगवान आणि तपशीलवार अपडेट आणि बातम्या माध्यमांपर्यंत पोहोचविण्यासाठी राजकीय पक्षांच्या श्रेणीमध्ये प्रभासाक्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोमवारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित विचार संगम या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक श्रीनिवास बिक्कड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

’प्रभासाक्षी’ समूहाद्वारे द्वारे देशभरातील राजकीय पक्षांच्या माध्यम विभागाच्या कामकाजाचे सर्वेक्षण करण्यात येते. यावर्षीच्या सर्वेक्षणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाने वेगवान आणि तपशीलवार अपडेट्स तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू अशा विविध भाषांमध्ये वेळेत आणि नेमकी माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात देशात प्रथम क्रमांक मिळवल्याने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाला प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये आयोजित ‘प्रभासाक्षी’च्या २२ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात IAAN समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.अनुज गर्ग व निस्कॉर्ट मिडिया इन्स्टिट्यूटच्या प्राचार्य डॉ. रितु दुबे-तिवारी व प्रभासाक्षीचे मुख्य संपादक निरज दुबे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक श्रीनिवास बिक्कड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

श्रीनिवास बिक्कड

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या पुरस्काराबद्दल मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि माध्यम समन्वयक श्रीनिवास बिक्कड यांच्यासह संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. सद्याच्या परिस्थितीत मीडिया विभागाचे काम अत्यंत महत्वाचे आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा खा. सोनियाजी गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खर्गे आणि आमचे नेते राहुलजी गांधी यांचे विचार आणि भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेसचा मीडिया विभाग करत आहे असे पटोले म्हणाले.

नाना पटोले

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा माध्यम विभाग काम करत असून त्यांनी आखून दिलेल्या रणनितीनुसार काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माध्यम विभाग काम करत आहे. विभागाच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून देशभरातील प्रथम पुरस्कार मिळाला आहे ही अत्यंत आनंदाची बाब असून विभागाच्या कार्याला बळ देणारी असे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content