Homeबॅक पेज१५व्या आदिवासी युवा...

१५व्या आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमाला मुंबईत सुरूवात!

आदिवासी युवा वर्गाने अंमली पदार्थ आणि मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहून देशाचे जबाबदार नागरिक व्हावे, असे आवाहन, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक वैभव निंबाळकर यांनी केले आहे. मुंबईत आयोजित पंधराव्या आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या मराठी भाषा भवनात या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. आदिवासी युवा वर्गाने कठोर परिश्रम करून जीवनात यशस्वी व्हावे, अशी अपेक्षाही निंबाळकर यांनी व्यक्त केली.

नेहरू युवा केंद्र संघटनेचे राज्य संचालक प्रकाश कुमार मनुरेही यावेळी उपस्थित होते. या आदान -प्रदान कार्यक्रमामुळे आदिवासी तरुणांचे देशाच्या इतर भागांतील समवयस्क गटांशी भावनिक बंध निर्माण होतील आणि त्यांच्या मनात स्वाभिमानाची भावनाही निर्माण होईल, असे ते यावेळी म्हणाले. मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव अशोक घुले, ज्येष्ठ समाजसेवक रामकुमार पाल हे मान्यवरही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमात विविध विषयांवर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. तसेच श्रमदान शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता मोहीम आणि भाषण स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले.

आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात झारखंड राज्यातील गुमला, खुंटी, लातेहार, सेराईकेला-खरसावन, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, तेलंगणा राज्यातील भद्रादरी आणि बिहार राज्यातील जमुई, लखीसराय या जिल्ह्यांतून एकूण 220 युवा सहभागी होत आहेत.

येत्या 30 ऑक्टोबर रोजी ही युवा मंडळी राजभवनाला भेट देऊन माननीय राज्यपालांशी संवाद साधतील. 31 ऑक्टोबर रोजी विधान भवनाला आणि 01 नोव्हेंबर रोजी तळोजा येथे केंद्रीय राखीव पोलीसांच्या शीघ्र कृती दलाच्या परिसराला भेट देण्याची संधी सहभागींना मिळणार आहे. या उपक्रमांतर्गत सहभागी युवा वर्गाला भारतीय चित्रपट संग्रहालय, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, जुहू बीच अशा इतर प्रसिद्ध ठिकाणांनाही भेट देता येणार आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content