Homeहेल्थ इज वेल्थदेशातल्या 30 ईएसआयसी...

देशातल्या 30 ईएसआयसी रुग्णालयांमध्ये केमोथेरपी सुरू!

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल नवी दिल्लीतील ईएसआयसी (कर्मचारी राज्य विमा महामंडळ) मुख्यालयात आयोजित महामंडळाच्या 191व्या बैठकीत देशभरातील 30  ईएसआयसी रुग्णालयांमध्ये केमोथेरपी सेवेचा प्रारंभ केला.

या सेवेचा प्रारंभ हे देशाच्या अमृत काळात आपल्या श्रमयोगींच्या सर्वांगीण कल्याणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना साकार करण्याच्या दिशेने उचललेले एक पाऊल असल्याचे यादव याप्रसंगी म्हणाले. ईएसआयसी रुग्णालयांतर्गत केमोथेरपी सेवा सुरू झाल्यामुळे, विमाधारक कामगारांना आणि त्यांच्यावरील अवलंबित कुटुंबीयांना कर्करोगावर अधिक चांगले उपचार सुलभ होतील.

केंद्रीय मंत्र्यांनी ईएसआयसीच्या डॅशबोर्डसह नियंत्रण कक्षाचेही उद्घाटन केले. ईएसआयसी रुग्णालयांमधील संसाधने आणि खाटा, चालू बांधकाम प्रकल्पांची सद्यस्थिती इत्यादींवर अधिक चांगली देखरेख डॅशबोर्डमुळे सुनिश्चित होईल.  ईएसआयसी रुग्णालयांमध्ये कुशल वैद्यकीय व्यावसायिकांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात आपले कार्य पुढे नेण्याचा निर्णय ईएसआयसीने घेतला आहे, अशी माहिती यादव यांनी दिली.

आवश्यकतांचे  आकलन केल्यानंतर नवीन ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये स्थापन केली जातील. आतापर्यंत, 8 वैद्यकीय महाविद्यालये, 2 दंत महाविद्यालये, 2 नर्सिंग कॉलेज आणि एक पॅरा-मेडिकल कॉलेज स्थापन करण्यात आली असून ती ईएसआयसीकडून चालवली जात आहेत, असे यादव यांनी सांगितले.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content